spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“वाढवण बंदर आर्थिक व्यापाराचे केंद्र बनणार” – PM Narendra Modi

वाढवणं बांदरानिमित्त आज (२० ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण झाले आहे. या मार्गक्रमणाचा पहिला टप्पा हा  सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला ते भेट आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दुपारी दीडच्या सुमारास ते पालघरसाठी रवाना झाले आहेत, पालघर येथील सिडको ग्राऊंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. हे बंदर भारतातील सर्वांत मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असणार आहे. या बंदराच्या कामाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मोदी यांनी आपले मन्तव्य मांडले आहे. जाणुयात काय म्हणत आहेत ते..

नरेंद्र मोदी काय म्हणाले ?

“२०१३ मध्ये मला बीजेपी ने पंतप्रधान पदासाठी निवडलं तेव्हा मी रायगडच्या किल्ल्यावर गेलो होतो. त्यावेळी त्यांच्या मी आराध्य देवाला पाया पडलो. शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत माफी मागितली आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या विकास यात्रेचा मोठा दिवस आहे. विकसित भाताचा हा महत्वाचा भाग आहे. पहिले १ ० वर्ष असूदेत अथवा आताचे हे ३  वर्ष असोत मी महाराष्ट्राला विकसित देश बनवलं. आधुनिक बंदमुळे आर्थिक विकासाचे मोठं केंद्र बनणार. यासाठी ७६ करोड पेक्षा जास्त पैसे लागणार आहेत. हा देशातील सर्वात महत्वाचा पोर्ट होईल. हा पोर्ट मोठं औद्योगिक केंद्र बनणारआहे. मी पालघर आणि महाराष्ट्राच्या लोकांना खूप शुभेचचा देतो. २ ,३  दिवसापूर्वीच दिघी पोर्ट साठी सुद्धा मंजुरी डेली आहे. ही महाराष्ट्रीय लोकांसाठी मोठी खुशखबरी आहे. हा औद्योगिक क्षेत्र हे शिवाजी महाराजच्या रायगडावर होणार आहे. हे त्यांच्या स्वप्नाचे प्रतीक बनणार आहे. त्याचसोबत हे पर्यटन आणि इकोरेसॉर्ट साठीही याची मदत होईल. आज इथे मच्छीमार यांच्यासाठीसुद्धा ७०० करोड रुपयांपेक्षाही जास्त विकास कामांची व परियोजनांची योजना आहे. वाढवणं पोर्ट, दिघी पोर्ट, फिशरमन योजनांसाठी असेल, इंडस्त्रायल एरिया विकास यांसारखे मोठी कामही महालक्ष्मी, मुंबादेवी आणि जीवदानी, तुंगारेश्वर देव यांच्या आशीर्वादाने होत आहे. एक वेळी समृद्ध आणि सशक्त राष्ट्र म्हणून ओळखले जात. शिवाजी महाराजांनी समुद्री व्यापाराला बदौती दिली. त्याचप्रमाणे आपणही देत आहोत. आपण ब्लु रेवोलशन स्कीम सुरु केली होती यामुळे रोजगाराची संधी उपलब्धी झाली आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेमुळे महिलांनासुद्धा रोजगार मिळाला आहे. राज्य विकासात १५ लाख मच्छिमोरांचे योगदान मिळाले आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी काहीच बनवले गेले नाही. हा समाज भारताच्या प्रगतीत योगदान देत आहे. या सरकार मध्ये सुद्धा महिलांना प्रमुख स्थान दिले आहे. उदा .  सुवर्ण केवळे, जया भागत, प्राची स्वरूप, अश्विनी भिडे, माधुरी खानविलकर, अपूर्व पालकर जे महत्वाची पदे महिला सांभाळत आहेत. सबका साथ, सबका विकास हा NDA चा नियम आहे, तत्व आहे. मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.”

हे ही वाचा:

“आदिवासी भागातील PESA कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक”; Cm Eknath Shinde यांची ग्वाही

Congress ला मोठा मिळणार फटका; JItesh Antapurkar करणार BJP मध्ये एन्ट्री

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss