गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात नागपुरात राहणारे दोन तरुण वाहून गेल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथे घडली आहे. अंघोळीसाठी कालव्यात उतरलेले असताना एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही वाहून गेल्याचे सांगण्यात येत होते यापैकी आता एकाचा मृतदेह काही अंतरावरती आढळून आला तर दुसरा तरुणाचा शोध सुरू आहे विशेष म्हणजे त्या भागात तरुण बुडण्याची ही दुसरी घटना आहे.
हेही वाचा :
पाकिस्तानातील पूर परिस्थितीवर भारताच्या पंतप्रधानांनी केलं मोठे व्यक्तव्य
नाईन खान लाल खान वय (वर्ष २२) आणि अमित शहा लाल शहा वय (वर्ष २२) असे हे वाहून गेलेल्या तरुणांचे नाव. हे दोन्ही तरुण गावोगावी जाऊन कपड्यांची विक्री करायचे. हे दोघे मूळचे मध्य प्रदेशातील राहणारे रहिवासी होते. काही दिवसांपासून ते कापडाच्या व्यवसायासाठी नागपुरात राहत होते. उपजीविकेच्या साधन म्हणून गावोगावी ते कपडे विक्रीचा व्यवसाय करायचे.
आशिया चषक स्पर्धेत अटीतटीच्या लढाईत आता, भारत विरुद्ध हाँगकाँग
दरम्यान भंडारा जिल्ह्यात तलावात बुडून तीन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच संध्याकाळच्या सुमारास घडली होती १८ ते २० वर्षे वयोगटातील युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता प्रशासनाने तिघांचेही मृतदेह तलावातून बाहेर काढले पवनित तालुक्यातील या गावात ही घटना घडली हे युवक या तलावात नेमके कशासाठी गेले होते याबाबतची कोणतीही माहिती अध्यापही समोर आलेली नाही तसेच तलावाच्या ग्रामस्थांनी युवकांची सायकल आणि कपडे आढळले नाही. शिवाय हे तिन्ही युवक बेपत्ता असल्यामुळे ते तलावात बुडाले असल्याची शक्यता ग्रामस्थांना वाटत होती. त्यानुसार ग्रामस्थांना शोधमोहीम सुरू केली आणि बालक रंगारी अशी अमृता तरुणांची नावे असून त्यांच्या या बातमीमुळे पत्रे गावात शोककळा पसरली आहे.
नोकियाचा नवा अविष्कार : ५,००० पेक्षा कमी किंमतीचा आणि 4G मोबाईल भारतात लॉन्च