Jammu Kashmir : राजौरीमध्ये भारतीय लष्कराकडून 2 दहशतवादी ठार, तर 3 जवान शहीद

Jammu Kashmir : राजौरीमध्ये भारतीय लष्कराकडून 2 दहशतवादी ठार, तर 3 जवान शहीद

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील लष्कराच्या छावणीत दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत भारतीय लष्कराच्या जवानांनी (Indian Army) दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दरम्यान गोळीबारात सुरु असल्यामुळे यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. राजौरी येथील लष्कराच्या छावणीत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उरी हल्ल्याची (Uri attack) आठवण करून देणारा आहे.

जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) राजौरी येथील लष्करी छावणीत किती दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करत होते याबाबत कोणतीही अद्यापही कोणतीही माहिती समोर आलेली नसून, या चकमकीत भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर, लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत.

सध्या भारतीय लष्करी छावणीत व आजूबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशन (search operation) सुरू असून आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी देशाला हादरवून सोडण्यासाठी कोणतीही मोठी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटना सातत्याने करत असतात. गुप्तचर यंत्रणा सतर्क आहेत आणि भारतीय सुरक्षा दले दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांना ठामपणे हाणून पाडत आहेत.

जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी दिली माहिती

जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले, “राजौरीतील परगल, दारहाल भागातील लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा कोणीतरी प्रयत्न केला, त्यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दारहाळ पोलिस ठाण्यापासून सहा किलोमीटर अंतरापर्यंत अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत. यात दोन दहशतवादी ठार झाले असून लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत.

हेही वाचा : 

आंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेतेपदाला काँग्रेसचा विरोध

Exit mobile version