Thursday, July 4, 2024

Latest Posts

सत्ताधारी कपटी, मराठा आणि ओबीसीत फुट पाडतायत; Kiran Mane यांचे ‘X’ पोस्टमधून सरकारवर ताशेरे

मराठा - ओबीसी वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. अश्यातच, अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या 'X' अकाऊंटवरून खास पोस्ट लिहीत महाराष्ट्रातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केले आहे.

सध्या महाराष्ट्रात आरक्षणप्रश्नावरून वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे मराठा आरक्षणसाठी (Maratha Reservation) लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी ओबीसी आरक्षण बचाओचा (OBC Reservation) नारा देत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला आहे. त्यामुळे, मराठा – ओबीसी वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. अश्यातच, अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून खास पोस्ट लिहीत महाराष्ट्रातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केले आहे.

किरण माने यांची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यायच्या त्यांनी म्हंटले आहे कि, “सत्ताधार्‍यांचं बरोबर आहे भावांनो. ते कपटीच आहेत. दिवसभर ‘हाके-जरांगे’ दाखवुन मराठा आणि ओबीसीत फुट पाडण्याशिवाय पर्यायचं नाही त्यांना… दोष आपला आहे. आपण जमिनीवर येऊन यामागची कारणं समजून घेत नाही. आपल्यातला दुवा शोधत नाही. मेंदूत कोरून ठेवा, आपल्या सगळ्या जातींत एक समान धागा आहे, तो म्हणजे ‘शेती’ ! या सगळ्या शेतकरी जाती आहेत. आपल्यातला हा ‘ओलावा’ मनात जपला, तर शत्रूचे कारस्थान कशासाठी आहे हे कळेल… आणि मग त्यांनी कितीही आग लावुद्यात… आपण भडकणार नाही.”

“मला सांगा, शेतमालाचे भाव कोसळलेले आहेत की नाहीत??? याचा वाईट परिणाम या सगळ्या जातींच्या संसारांवर होतोय. दुधाला मिळणार्‍या छितपुट भावावर घर कसं चालवणार, हा मराठाओबीसींपुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळं नुकसान होऊनसुद्धा मराठा ओबीसींसह अनेकांना पिकविमा मिळालेला नाही… सगळे अस्वस्थ आहेत. खुप शातीरपणे तुमची ही अस्वस्थता तुमच्यातच तेढ निर्माण करायला वापरली जात आहे. वाढत्या बेरोजगारीचा फटका मराठा पोरांनाही तेवढाच बसतोय, जेवढा ओबीसींना बसतोय, दलितांनाही बसतोय. मुसलमान, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारसी सगळ्यांना बसतोय. पेपर फुटीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या सगळ्या बहुजन विद्यार्थ्यांचं करीयर बरबाद झालं आहे.”

पुढे ते म्हणाले, “…आपल्या मनात एकमेकांविषयी जातींवरून द्वेष निर्माण झाला नाही तर आपला सगळा ‘फोकस’ मुळ प्रश्नांवर होईल… पोटापाण्यावर होईल… जगण्यावर होईल… आणि सत्ताधारी शत्रूचा नाकर्तेपणा उघड होऊन त्यांचे वांदे होतील. मराठा, माळी, धनगर, वंजारी, साळी, कोळी, कोष्टी, सुतार, लोहार, दलित… सगळ्या-सगळ्यांचं जगणं हराम करणारा एकच दुश्मन आहे… सत्ताधारी ! या बांडगुळांनी लोकसभा हिंदुत्व हिंदुत्व,मुसलमान मुसलमान करत लढवली. तिथं जनतेनं मुस्काडात दिली. त्यातून शहाणपणा न शिकता आता मराठा मराठा, ओबीसी ओबीसी, दलित दलित बोंबलत विधानसभेचं जाळं रचलं जातंय. ते उद्धवस्त करूया. लोकसभेला पटात घुसलोय आपण… आता विधानसभेला धोबीपछाड घालून या समाजफोड्यांना आस्मान दाखवूया. जय शिवराय… जय भीम !”

किरण माने यांची हि पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे. ते नेहमीच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. अश्यातच, आता त्याआणि राज्यात सुरु झालेल्या मराठा- ओबीसी वादावर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा

Manoj Jarange Patil यांच्या मागणीचा हेतू राजकीय? आरक्षण म्हणजे खिरापत नाही, Laxman Hake यांचा हल्लाबोल

मुस्लिमांना देखील OBC मधून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच; Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss