Kolhapur Mumbai Airliance : आजपासून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला सुरुवात

बहुप्रतिक्षित कोल्हापूर - मुंबई विमानसेवेला (Kolhapur Mumbai Airliance) आजपासून सुरुवात होणार आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थितीती दर्शवणार आहेत.

Kolhapur Mumbai Airliance : आजपासून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला सुरुवात

बहुप्रतिक्षित कोल्हापूर – मुंबई विमानसेवेला (Kolhapur Mumbai Airliance) आजपासून सुरुवात होणार आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थितीती दर्शवणार आहेत.

कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा संजय घोडावत यांच्या ‘स्टार एअरवेज’ कंपनीकडून सुरू केली जात आहे. कोल्हापूर मुंबई विमानसेवा कोरोना काळात बंद करण्यात आली. कोल्हापूर मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता. पण कंपनीने अचानक ही सेवा बंद केली होती. त्यानंतर सेवा सुरू व्हावी अशी प्रवाशाची अनेक दिवसांपासून मागणी होती. अखेर या मागणीला यश मिळाले. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना ही सेवा सोयीची ठरणार आहे. सध्या कोल्हापूरातून तिरुपती, बंगळुरू, अहमदाबाग, हैदराबाद या शहरात सध्या विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ही आठवड्यातून तीन दिवस असणार आहे. आठवड्यातील मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी ही विमानसेवा असणार आहे. कोल्हापूर ते मुंबईसाठी २ हजार ५७३ रुपये इतका तिकीट दर असणार आहे. या विमानसेवेमुळे कोल्हापूर- मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. विमान मुंबई विमानतळावरून १०.३० वाजता उड्डाण करेल आणि कोल्हापुरात ११.२० मिनिटानी कोल्हापुरात पोहचणार आहे. अवघ्या ४० मिनिटाचा हा प्रवास असणार आहे. तर कोल्हापुरातून सकाळी ११.५० वाजता उड्डाण करणार आणि मुंबईत १२.४५ वाजता पोहचणार आहे. कोल्हापूर – मुंबई मार्गावर विमानसेवा सुरु व्हावी, अशी प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी होती.

हे ही वाचा:

Dhiraj Deshmukh : धिरज देशमुख यांनी राज्य सरकारवर केली खोचक टीका

Mangalyaan : अखेर ‘मिशन मंगळयान’ चा The End

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version