Maharashtra Unseasonal Rain: राज्यात उद्यापासून अवकाळी पावसाचा इशारा, पिकांना फटका बसण्याची शक्यता

राज्यातील अनेक भागात उद्या पासून अवकाळी पाऊस बरसण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात १३ ते १६ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला गेला आहे

Maharashtra Unseasonal Rain: राज्यात उद्यापासून अवकाळी पावसाचा इशारा, पिकांना फटका बसण्याची शक्यता

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत-पिकांचे नुकसान

राज्यातील अनेक भागात उद्या पासून अवकाळी पाऊस बरसण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात १३ ते १६ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला गेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज सांगण्यात आल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच विदर्भात १४ ते १६ मार्च या कालावधीत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो.

मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानी विषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू लावून धरत शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. ”नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर आणि राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा,‍ लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे. वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत. शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर, व संत्रा लिंबू यांची फळे गळल्याने उत्पादनावर विपरीत परीणाम होणार आहे. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.” अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली होती.

अवकाळी पावसामुळे राज्यातील 13 हजार ७२९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणार असल्याचे फडणवीसांनी विधानसभेत सांगितले होते.

हे ही वाचा :

डझनभर साखर कारखान्यामध्ये जनतेच्या पैश्यांची लूट होत असताना ED का गप्प, संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल

IND vs AUS – ३ वर्षानंतर विराट कोहलीचे अविस्मरणीय शतक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version