नवी मुंबई स्थानकाजवळ भीषण आगीत ४२ दुचाकी जळून खाक

नवी मुंबई स्थानकाजवळ भीषण आगीत ४२ दुचाकी जळून खाक

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या (Mansarovar Railway Station) पार्किंग परिसरात (parking area) सोमवारी सायंकाळी आग लागल्याने ४२ मोटारसायकली (Motorcycles) जळून खाक झाल्या आहेत. कळंबोली (Kalamboli) येथील अग्निशमन दल (fire brigade) आणि कामोठे (Kamothe) येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी आहेत. कळंबोली अग्निशमन केंद्राच्या म्हणण्यानुसार, त्यांना संध्याकाळी ५.५० च्या सुमारास आगीचा कॉल आला आणि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एका इंजिनने प्रयत्न केले. मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर ४२ दुचाकी उभ्या होत्या.

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाजवळ दुचाकींना आग लागली आहे. या आगीत पार्किंगमधील तब्बल ४२ गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन विभागाकडून आग आटोक्यात आणली जात आहे. परंतु, या भीषण आगीत गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. नवी मुंबईतील मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना ही आग लागली आहे. आगीत पार्किंमध्ये उभा करण्यात आलेल्या ४२ गाड्या जळून खाक झाल्या असून समाजकंटकाकडून ही आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

मुंबईमध्ये कामासाठी येणारे लोक मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर आपल्या दुचाकी पार्क करतात. आज देखील नेहमी प्रमाणे येथे दुचाकी पार्क करून अनेक जण कामावर गेले होते. परंतु, सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास या पार्किंगमध्ये आग लागली. ही आग एवढी भीषण होती की पार्किंगमधील ४२ दुचाकी या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत या दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.

हे ही वाचा : 

भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पुर्णविराम

Shraddha Murder Case मोठी बातमी! श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version