मुंबई विमानतळावर मोठा अपघात, विमान क्रॅश

मुंबई विमानतळावर खासगी विमान (VSR Ventures Learjet ४५ aircraft VT-DBL) कोसळलं आहे. खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या एअरक्राफ्टमध्ये बसलेले काही प्रवाशांचा देखील मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुंबई विमानतळावर मोठा अपघात, विमान क्रॅश

मुंबई विमानतळावर खासगी विमान (VSR Ventures Learjet ४५ aircraft VT-DBL) कोसळलं आहे. खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या एअरक्राफ्टमध्ये बसलेले काही प्रवाशांचा देखील मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हे विमान विशाखापट्टनमवरून मुंबईला येत होतं. या दुर्घटनेनंतर मुंबई विमानतळारील टेक ऑफ आणि लँडिंग बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमान लँडिंग करताना ही दुर्घटना (Mumbai Plane Crash) घडल्याचं सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, या अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाल्याचं सांगण्यात येत आहे. या विमानात ६ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्ससह ८ जण प्रवास करत होते.

संबंधित घटना ही आज संध्याकाळी ५ वाजून २ मिनिटांनी घडली. विशाखापट्टनमच्या विझाग येथून निघालेलं विमान मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी खाली उतरत होतं. यावेळी प्रचंड पाऊस पडत होता. खराब हवामान होतं. त्यामुळे लँडिंग करत असताना जमिनीच्या अवघ्या काही अंतरावर असताना हे विमान क्रॅश झालं. हे विमान रनवे २७ येथे लँड होणार होतं. पण त्याआधीच ही दुर्घटना घडली. विमान क्रॅश झाल्यानंतर तातडीने पोलीस, एयरपोर्ट अथॉरिटी टीम, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा पथकांनी तातडीने विमानात असलेले क्रू-मेंबर्स आणि इतर नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. अपघातग्रस्त विमानातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. या विमान अपघातात तीन जण जखमी झाले. तर पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलंय. या घटनेमुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम पडलाय.

हे खासगी विमान विशाखापट्टणमवरुन मुंबईकडे येत होतं. मुंबईत सुरु असलेल्या तुफान पावसामुळे सध्या खराब हवामान आहे. विमानाचं जेव्हा लँडिंग होत होतं, त्यावेळी विमान नियंत्रणाबाहेर गेल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच हे खासगी विमान कोसळलं आणि भीषण दुर्घटना घडली. या अपघातात आतापर्यंत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर जण सुखरुप असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई विमानतळावर दररोज एकूण ९०० विमानांची ये-जा होते. विमान क्रॅश झाल्याने काहीवेळासाठी मुंबई विमानतळावर टेक ऑफ आणि लॅन्डिंग बंद असल्याने, मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईहून जाणाऱ्या विमानाचं वेळापत्रक कोलमडलं आहे. मुंबई एअरपोर्टचा हा रनवे क्लिअर करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. खराब हवामामुळे हे प्लेन क्रॅश झाल्याचं सांगण्यात येत असलं, तरी याची मात्र चौकशी नक्कीच होवू शकते. मुंबईतून दररोज २ ते ४ लाख विमानप्रवासी विमान प्रवासासाठी ये – जा करतात.

Exit mobile version