१ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशातील ६५ बडे नेते एकत्र आले होत त्याचबरोबर उपराष्ट्रपती देखील उपस्थित होत्या आणि त्याच दिवशी संध्याकाळी मराठवाड्यातील जालन्यामध्ये अशा घटना घडली की , ज्यामध्ये पोलिसांवर हल्ला झालेलं आणि त्यावेळे परिस्थिती चिघळतेय की काय असे वाटत होते. परंतु मुंबई पोलीस हा सजक होता आणि आणि हे मुंबई पोलीस ६५ हुन अधिक आलेल्या बड्या नेत्यांच्या सुरक्षिततेचा भाग देखील त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता. त्यामुळे त्यानेच दिवशी मुंबई पोलिसांना तीन वेगवेगळ्या पण अगदी जबाबदारीची कामगिरी हि त्यांना सोपवण्यात आली होती. आणि महायुती चा देखील सत्ता टिकवण्यासाठी घातलेलं घाट या सगळ्याकडे लागलं होता. त्यामुळेच एकंदर काय तर पोलिसांची जणू काही तारेवरची कसरत चालूच होती. आणि म्हणूनच राज्यातले आणि केंद्रातले असे दोन्ही पोलीस कामाला लागले होते. या सगळ्यांचा प्रतिनिधित्व ज्येष्ठ पोलीस अधिकारी १९८९च्या बॅचचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे होते. नेमके एकाच दिवशी या सर्व बड्या नेत्यांनी घातलेला घाट आणि त्यामध्ये पोलिसांची कामगिरी आणि जबाबदारी या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने नेल्या यासंदर्भात जाणून घेणार आहोत.विवेक फणसळकर यांनापोलिसांच्या ड्युटी संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने वर्दीच्या ड्युटीचे मोजमाप करून दाखवले.
टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर सरांना दत्ता पडसळकर यांनी घेतलेल्या मुद्द्यावर हात घालून आठ तासाच्या पोलीस दलाच्या ड्युटीसंदर्भात विचारले असता विवेक सरानी त्यावर त्यांना आठ तासाच्या ड्युटीचे गणित उलगडून सांगितले. खर बघायला गेलं तर दत्ता पाडसाळकरांनी आठ तासाच्या डूटीचा विषय जरी उचलून धरला आता त्या प्रहसनाकडे जास्त लक्ष दिल गेलं आंही आणि त्यामुळे आठ तासाच्या डूटीचा प्रश्न हा प्रलंबित राहिला आहे . मात्र मुंबई पोलिसांनी उलगडून सांगितले आठ तासाच्या कामाचं गणित विवेक फणसळकर म्हणाले, पोलीस दलाच्या कामाचे स्वरूपाचं असा आहे कि, शिफ्ट संपताना देखील काम आले तर ते करावं लागत. आणि त्यावेळी कोणताही कारण देता येत नाही. आणि त्यावेळी घटनास्थळी धावून जातात आणि म्हणूनच मला त्याबाबत अभिमान आहे. त्यामुळं मुंबई पोलियस हा सगळीकडे जातो हेही तितकेच खरे आहे. त्याचबरोबर आठ तास ड्युटीचा विचार जर करायचा झाला तर, मुंबई शहर हे शांत शहर नाही आहे. इथे सारखीच वर्दळ असते. मुंबई शहर हे न झोपणार शहर आहे. त्यामुळे २४ तास मुंबई हि रात्रंदिवस जागीच असते. फक्त २ तास मुंबई पोलिसांना अराम मिळतो. जसा कि, आपण म्हणू शकतो मुंबईची लाईफलाईन असणारी आपली रेल्वे हि २ तास क्षणात असते अगदी त्याचप्रमाणे किंवा मी म्हणेन त्यापेक्षा कमी स्वरूपात मुंबई पोलीस हे आराम करत असतात. आठ तासाच्या गणिताचं जर मोजमाप करायचं झालं तर पोलिसांच्या ३ शिफ्ट नुसार त्यांच्या शिफ्ट या लावल्या जातात. आणि त्यामुळे ८ तासाच्या शिफ्ट मध्ये फक्त २५ ते ३० लोकच हाताशी असतात. आणि मुंबई सारख्या शहरात हे अशक्य आहे.
त्याचबरोबर कोविड सारख्या ममहामारीने संपूर्ण देशाला वेठीस धरला होता. आणि त्यामुळे सगळेच व्यवहार आणि शासकीय विभागात भरती प्रक्रिया या होत नव्हत्या. त्यामुळे देखील पोलीस भरती या गेल्या २ वर्षात झाल्या नाहीयेत. आणि त्याचा परिणाम देखील पोलीस खात्यावर झाला आहे. अगदी महत्वाच्या हुद्द्यावर असणाऱ्या पोलिसांपासून ते शिपायापर्यन्त सगळ्यांनाच जास्त वेळ काम करावे लागत आहे आणि तशी गरज देखील भासत आहे. त्यामुळे अगदी शिफ्ट संपत असताना जरी काही गुन्हा आला तरी देखील तो रजिस्टरवर घेऊन त्यासंबंधी काम केल्यावरच घरी जात येत. मात्र त्यावेळेस घरी जाण्याचे वेध लागलेले असून देखील घरी जात येत नाही त्यामुळे मनात थोडीशी खंत हि असतेच. तरी देखील मुंबई पोलीस दल हे कायम त्यांच्या जबाबदारी मध्ये तत्पर असते. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. असे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले.
हे ही वाचा:
Exclusive, CP Vivek Phansalkar: प्रत्येक क्षणाला सुरु असते मुंबई पोलिसांची कसोटी
World Cup 2023, टीम इंडियाच्या ‘या’ १५ खेळाडूंची झाली निवड…