spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सदावर्तेंनी केला मोठा दावा, “फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवारांनी रचला”

काल दि. २४ जानेवारी रोजी ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमांचं आयोजन दिवसभर करण्यात आलं आहे.

काल दि. २४ जानेवारी रोजी ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमांचं आयोजन दिवसभर करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, सुधीर मुनगंटीवार, उदय सामंत, संजय राऊत यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे मुंबई सीपी संजय पांडे यांना दिलं होतं म्हणतं मोठा गौप्यस्फोट केला आहे. आता या संदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. आज मुंबईत प्रत माध्यमांशी गुणरत्न सदावर्ते हे बोल्ट होते आणि यावेळी बोल्ट असताना ते म्हणाले, फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवार यांनी रचला आहे.

माध्यमांशी बोलत असताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “दिलीप वळसे पाटील यांच्या तोंडून काल ‘कट’ असा एक शब्द निघाला. त्या शब्दाचा मतितार्थ लक्षात घेतला पाहिजे. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मला अटक करण्यात आली होती. त्या अटकेनंतर एक श्रृंखला सुरू झाली. पोलिसांना माहिती होतं की मी कोर्टात युक्तीवाद करत होतो. मात्र, त्यांच्या डोक्यात वेगळंच शिजत होतं. अटकेनंतर ते माझ्या लक्षात आलं”, अशी प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.

“हा सर्व कट कुठं रचला गेला मला माहिती आहे. मला अटक झाल्यानंतर काही नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. संजय पांडे हे सुद्धा या बैठकीत उपस्थित होते. त्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला”, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच याप्रकरणी दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील आणि अजित पवारांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही सदावर्ते यांनी केली.“आरोपी गुन्हेगार गुन्हा करतो. मात्र, एकतरी पुरावा सोडून जातो. गावदेवी पोलीस ठाण्यातील एक हार्डीस्क आहे, ती एकदोन दिवसांची नाही, त्यात दोन वर्षांचं रेकॉर्डींग आहे. ती आणा, कोल्हापुरातील फुटेज आणा, त्यातून हा कट कशाप्रकारे रचण्यात आला होता, हे लक्षात येईल, असेही ते म्हणाले. या सर्वामागे मास्टरमांईड शरद पवार आहेत”, आरोपही त्यांनी केला.या सर्वामागे मास्टरमांईड शरद पवार आहेत. त्यांच्याच काळात दाऊद इब्राहीम मोठा झाला, आपल्या देशातील लोकांना मारून गेला. शरद पवारांचं डोकं आजारी असतानाही खूप चालतं, असा आरोपही त्यांनी केला. शरद पवार इतके घाणेरडे राजकारणी कोणीच नाही. मराठा युवकांची दिशाभूल करणारे, महाराष्ट्राची जातीपातींमध्ये विभागणी करणारे आणि देवेंद्र फडणवीसांच्या अटकेचा कट रचणारेही शरद पवारच आहेत, अशी टीकाही सदावर्ते यांनी केली.

निलोत्पालांची डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या निलोत्पालांनी वारंवार मला रात्री लॉकअपमधून बाहेर आणलं जातं होतं. मला बसवलं जायचं आणि जी चर्चा केली जात होती, ती शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची कमी होती आणि नागपूर, आरएसएस, राईटविंग अॅक्टिव्हीस्ट आणि देवेंद्र फडणवीसांची भेट याच्यासंबंधी भेटी कधी झाल्या याचा तपास फिरवला जात होता.

हे ही वाचा:

ICC ODI Rankingमध्ये मोहम्मद सिराजचा ‘राज’ सर्व खेळाडूंनी मागे ठरला नंबर १ गोलंदाज

Maghi Ganesh Jayanti 2023 महाराष्ट्रात विविध ठिकाणी कशी साजरी केली जाते माघी गणेश जयंती

#HarSawalUthega म्हणत प्रजासत्ताक दिनानिमित्त टाटा कंपनीने लहान मुलांसाठी नवी मोहीम घेतली हाती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss