मुंबईमध्ये त्याचबरोबर ठाणे जिल्यामध्ये काल काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या मुंबईच्या सखल भागांमध्ये त्याचबरोबर रस्त्यांवर कुठेही पाणी साचलेले नाही. अंधेरी सबवे सुद्धा सकाळपासून वाहनांसाठी व इतर नागरिकांसाठी सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम पुणे जिल्यातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पुणे तसेच कोकणातील जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन हवामान खात्याने दिले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारी मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असल्याने शहरात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत, IMD ने सांगितले की, “शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल आणि पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांच्या लगतच्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.”
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९ आणि २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे .मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी साचले, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबईत ३० जून ते १ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ४६.९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत 30 जून ते १ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ४६.९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात आतापर्यंत २४ ते २९ जून दरम्यान नोंदवलेल्या पावसापैकी मुंबईत ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे, असे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
हे ही वाचा:
बुलढाण्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
नागपूरहून जाणाऱ्या एका खासगी बसचा भीषण अपघात
आज महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट