टी-२० वर्ल्डकप (T 20 WorldCup) जिंकून भारतीय संघ मुंबईत दाखल झाला असून सध्या विक्ट्री परेड (Victory Parade) सुरु असून चाहत्यांची अलोट गर्दी मुंबई उपनगरीय परिसरात झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात राज्य सरकारकडून संघातील मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल आणि पारस म्हांब्रे यांचा विधिमंडळात सत्कार केला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याकडून याबाबत घोषणा करण्यात आली. या गोष्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी संमती दिली आहे.
हे ही वाचा:
Follow Us