महाराष्ट्रात PM Modi जिथे जातील तिथे BJP चा पराभव निश्चित: Sanjay Raut

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत रोडशो होणार आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

महाराष्ट्रात PM Modi जिथे जातील तिथे BJP चा पराभव निश्चित: Sanjay Raut

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज (१५ मे, बुधवार) मुंबईत रोडशो होणार आहे. शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. “जिथे जिथे नरेंद्र मोदी जाणार तिथे महाविकास आघाडीचा विजय होणार,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केली.

यावेळी बोलना संजय राऊत म्हणाले, “जिथे जिथे नरेंद्र मोदी जाणार तिथे शिवसेना, महाविकास आघाडी जिंकणार. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावरती आणले आहे. हरण्याच्या दृष्टिकोनातून भाजप त्यांना रस्त्यावरती फिरवत आहे. तुमच्यावर दारोदारी रस्त्यावर भटकण्याची वेळ का आली हे लोकांना कळून द्या. मणिपूरला कधीच गेले नाही. दुसरं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाही का? मगरीचे अश्रू आता ते घाटकोपर या ठिकाणी जाऊन ढाळतील. आता गावागावात मोदी गो बॅक होणार आहे. ठाणे, मुंबई, नाशिक, भिवंडी, कल्याण, दिंडोरी या जागा बहुतेक महाविकास आघाडीच्या असतील. मोदींचा ब्रँड आता खतम झाला आहे. ४ जून नंतर त्यांना हिमालयात जायचं आहे, त्याची व्यवस्था महाराष्ट्राने केली आहे. भारतीय जनता पक्ष नकली आहे ओरिजनल नाही. स्वतःच त्यांच्याकडे काहीच नाही सर्व एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे त्यांच्याकडे स्वतः नरेंद्र मोदी देखील एक्सपोर्ट होतील हिमालयात… “

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाबाबत (Ghatkopar Hoarding Incident) बोलताना ते म्हणाले, “वादळामुळे होर्डिंग पडली त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आता शिवसेनेची सत्ता नाही. भाजपचे सत्ता मुंबई महापालिकेवरती आहे. तुमचा प्रशासन काय करत आहे इकडचा पालकमंत्री काय करत आहे? कोणाबरोबर कोणाचे फोटो आहेत. मोदी सोबत दहा गुंडांचे फोटो आहेत. छगन भुजबळ यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. पैशाने जीव विकत घेता येतो का? आणि मोदी रोड शो करत आहे,” असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP) नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घातल्याप्रकरणी ते म्हणाले,”नरेंद्र मोदी यांनी दाऊतशी व्यवहार केल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला होता. त्यांचा इकबाल मिरची सोबत कसा संबंध आहे हे सांगितलं होतं. मोदींनी असे आरोप केले होते, आणि त्याच मिरचीवाल्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांचा जिरे टोप घातला हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे. मोदी रोज येऊन महाराष्ट्राचा अपमान करत आहे.”

हे ही वाचा:

शिवाजी महाराजांचा अवमान करणा-या Praful Patel यांनी महाराष्ट्राची माफी मागावी: Nana Patole

Sushma Andhare on Raj Thackeray : तुम्हाला मुंबई घाबरत असेल पण मी नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version