spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai जमावबंदीबद्दल विश्वास नागरे पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये (Mumbai) १४४ कलमानुसार (144 as per section) म्हणजेच जमावबंदी (Prohibition) लागू होणार असं पोलिस प्रशासनाने (police administration) दिल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत . यासंदर्भातील खरी बातमी समोर येत नव्हती. त्यामुळे अनेकजण गोंधळून गेले. यासंदर्भातील स्पष्टता आता समोर आलेली आहे. खुद्द विश्वास नागरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं .

मुंबईसह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Mumbai Joint Commissioner of Police Vishwas Nangre Patil) यांनी ही अफवा (rumor) असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, मुंबईमध्ये कलम १४४ प्रमाणे जमावबंदी आदेश असल्याच्या बातम्या फिरत आहेत. परंतु त्यात तथ्य नाही. कायदा सुव्यवस्था (law and order) अबाधित राखण्यासाठी आणि अवैध मार्गाने मोर्चे आंदोलने करणाऱ्यांसाठी कलम ३७ (१) अन्वये पोलिसांकडून आदेश काढले जातात. हे आदेश दर १५ दिवसाला निघतात. सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे जमावबंदीचे आदेश निघालेले नाहीत. असं स्पष्टीकरण नांगरे पाटलांनी दिलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

काल मुंबईत जमावबंदीचे आदेश निघाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. २ जानेवारीपर्यंत हे आदेश असल्याचं त्यात सांगण्यात आलं होतं. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी (public places) मेळावे घेण्यास मनाई, फटाके फोडणे, लाऊडस्पिकर वाजणे (Loudspeaker), वाद्ये वाजणे (Playing instruments) यावर बंदी, घोषणाबाजीवर निर्बंध (Restrictions on sloganeering); असं नमूद करण्यात आलेलं. परंतु असे कोणतेही आदेश नसल्याचं आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितलं आहे.

हे ही वाचा : 

उदयनराजे यांच्या ‘त्या’ पत्राची राष्ट्रपतींकडून दखल

सोनम कपूरने केला तिच्या मुलाबद्दल मोठा खुलासा, म्हणाली

HIT 2 ‘हिट २’ मधील अभिनेता आदिवी शेषच्या अभिनयाची सोशल मिडीयावर होतेय स्तुती

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss