गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी राज ठाकरे नतमस्तक, तर धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President President Raj Thackeray) यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी राज ठाकरे नतमस्तक, तर धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President President Raj Thackeray) यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट बजावलं होतं. हे वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे हे आज परळी कोर्टात राहणार आहे. सकाळी अकरा वाजता ते हेलिकॉप्टरने बीडच्या गोपीनाथ गडावर (Gopinath Gad) दाखल झाले. तिथून ते साडेअकरा वाजता वॉरंट रद्द करण्यासाठी कोर्टात हजेरी लावणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळीत दाखल झाले आहेत. परळीत पोहोचतात त्यांनी पांगरी येथील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं आहे. यादरम्यान माध्यमांशी बोलण्यास ठाकरे यांनी नकार दिलाय. यावेळी औरंगाबादमध्ये राज ठाकरे हे हेलिकॉप्टरने आले आणि तिथून पुढे त्यांनी गाडीने प्रवास केला. यावेळी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्यातही हुर्डा पार्टीचे आयोजन करण्यात आलं होत. तसेच पुढे परळीमध्ये राज ठाकरे यांचं धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केलं आहे. राज ठाकरे यांच्या साठी तब्बल ५० फुटांचा हार देखील बनवण्यात आला. गोपीनाथ गड ज्या पांगरी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतं त्या पांगरी गावचे सरपंच सुशील कराड यांनी हा हार बनवला आहे. कराड यांच्याकडून राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुशील कराड हे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. तसेच राज ठाकरे यांच्या गाडीवर JCB मधून फुलांची उधळणं करत स्वागत केलं आहे. ढोल ताशाचा गजर, फुलांची उधळणं करत त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. तसेच या वेळी राज ठाकरे हे गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले आहेत.

राज ठाकरे यांना ऑक्टोबर २००८ साली मुंबईत अटक झाली होती. राज ठाकरे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी परळीच्या धर्मपुरीत बसेसवर प्रचंड दगडफेकही केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू झाली होती. ३ आणि १२ जानेवारी रोजी राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.परंतु राज ठाकरे हे कोर्टात हजर राहिले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी दोषारोप पत्रही कोर्टात सादर केलं आहे. मात्र राज ठाकरे प्रत्येक तारखेला गैरहजर राहिल्याने अखेर त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं.

हे ही वाचा:

पुण्यातील जुना बाजारातील दुकानांना भीषण आग, दहा दुकाने जळून खाक

उद्या मुंबई मेट्रो १ तब्बल २ तासांसाठी राहणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version