spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी झाली आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका. ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला तुम्ही गेला आहात त्या प्रभू रामचंद्रानं प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं म्हणून जनता म्हणते रामाचं राज्य आलं पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना खडे बोल सुनावले आहेत.

राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी झाली आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका. ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला तुम्ही गेला आहात त्या प्रभू रामचंद्रानं प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं म्हणून जनता म्हणते रामाचं राज्य आलं पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना खडे बोल सुनावले आहेत. त्याचबरसुबार प्रसार माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की , एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे. राजू शेट्टी म्हणाले की, राज्यात गेल्या २ ते ३ दिवसापासून राज्यात बेमोसमी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अत्यंत नुकसान झाले आहे. राज्यात जास्तीत जस्ट प्रमाणात कांदा, द्राक्ष, भोपळा, भाजीपाला, पेरु यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी हा आपला डेटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती केल्याशिवाय आपल्या पर्यंत फाजीपाला पोहोचु शकत नाही आणि शेतकरी आहे आपल्या शेतीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे शेतकरी आपलं पीक जपत असतो, पण निसर्गाच्या फटक्याने होत्याचं नव्हतं होते.

अवकाळी पाऊस आणि गारपीट म्हणजेच निसर्गाच्या कोपामुळे शेतकरीच नुकसान झाले. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे. मुख्यमंत्रीसाहेब प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यायचं असेल, तर खुशाल घ्या. ती तुमची व्यक्तिगत बाब आहे. मात्र, एक गोष्ट विसरून चालणार नाही राज्य प्रमुखाला व्यक्तिगत बाबींपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात आणि कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. असे स्पष्टीकरण शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले आणि तुमच्या राज्यात रामाचं राज्य निर्माण करायचं असेल, तर अडचणीत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या, एवढीच कळकळीची विनंती आहे.

दरम्यान, राज्यातील तिसऱ्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) १४ जिल्ह्यातील २८ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यातील आठ हजार हेक्टर शेतातील उभ्या पीकांचे नुकसान झालं आहे. त्याचबरोबर नगर जिल्ह्यात ७ हजार ३०५ हेक्टरवर नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. मका, कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.तर दुसरीकडे, अवकाळी पावसाने शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिले,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे, तर शेती नुकसानीचे प्राथमिक अंदाज आमच्याकडे आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 14 जिल्ह्यातील 28 हजार हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं आहे तर यासंबंधी पंचनामे करून शेतकऱ्यांना त्या पंचनाम्यांच्या आधारे नुकसान हर्पी देण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : 

राज्यामध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा

भात खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मास्क सक्ती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss