संजय राऊतांचा गंभीर आरोप, “मालवणमध्ये महाराजांचा पुतळा तुटला नाही तोडला”…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय.

संजय राऊतांचा गंभीर आरोप, “मालवणमध्ये महाराजांचा पुतळा तुटला नाही तोडला”…

Chhatrapati Shivaji Maharaj : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय. नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ३५ फुट्याच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी शिवरायांच्या या भव्य पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. पण अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला. हा पुतळा २६ ऑगस्टला दुपारी १ च्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. या घटनेमुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली. विरोधक राज्य सरकारवर तुटून पडले. याच प्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असताना या प्रकरणी माफी देखील मागितली आहे. परंतु या मुद्यावरून प्रतिक्रिया येणं काही मात्र थांबत नाहीय. या सगळ्या प्रकरणावर सामान्य जनतेपासून ते कलाविश्वातील अनेकपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्तही करण्यात आला. अश्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चांगलाच हल्लबोल केला आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी एक धक्कादायक वक्तव्य केले. “तुम्हीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडलात. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. “सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला नाही तुम्ही तोडलात”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच राऊत पुढे म्हणाले आहेत की, “जर तुम्ही छत्रपती शिवरायांचे खरे भक्त असाल तर तुमची बेळगाव-कारवार सीमाप्रश्नाविषयी तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा. महाराजांचं राज्य हे मराठी माणसांचं मावळ्याचं राज्य होतं. तुम्ही ते संपवायला निघालेले आहात. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही, हा नवीन चिंतनाचा विषय तुम्ही समोर आणला आहात. तुम्हाला इतिहास काय माहिती, तुम्ही शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू आहात. महाराजांनी एकदा नव्हे दोनदा सुरत लुटली, ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी लुटली. भाजपच्या प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

“ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथांनी मराठा साम्राज्य लयास नेलं आणि सर्वात आधी पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटीशांचा यूनियन जॅक फडकवला त्या पेशव्याचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत. त्याशिवाय त्यांनी अशी भाषा केली नसती. देवेंद्र फडणवीस कोणता इतिहास सांगत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढत आहोत आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देण्यास विरोध करताय. मालवणमध्ये महाराजांचा पुतळा तोडला हे तुमचं पाप आहे. तुम्हीच तोडलात. तुटला नाही तोडलात”, असा आरोप संजय राऊत यांनी केला. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात कोट्यावधींचा घोटाळा करणारे आजही मोकाट आहेत. त्यांना तुम्ही अटक करु शकत नाही. कारण ते तुमचे पेशवाईचे शिलेदार आहेत. शिवसैनिक जेव्हा मालवणला गेले, तेव्हा त्यांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचे काम जे भाजपचे गुंड करत होते. तुम्ही त्यांचे समर्थक आहात. पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे तुमचे गुंड आम्हाला महाराजांचा इतिहास शिकवणार का? तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणारे तुम्ही आहात. वेगळा विदर्भ करणं हे तुमच्या मनात आहे की नाही?” असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन होणार, बच्चू कडूंनी केला मोठा दावा

मालवण मध्ये जे झाले ते महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न; Devendra Fadnavis गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version