जालना आंदोलनावर शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया…

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना (Jalna) येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी शुक्रवारी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला मोठा गोंधळ उडाला होता.

जालना आंदोलनावर शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया…

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना (Jalna) येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी शुक्रवारी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान आज सकाळपासून आंदोलनाच्या ठिकाणी आणि जखमी गावकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी अनेक राजकीय नेतेमंडळी जालना दौऱ्यावर पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) एकाचवेळी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी काल नेमकं काय घडलं याबाबत माहिती जाणून घेतली. तर, लाठीचार्ज करणाऱ्यांना निलंबित (Suspended) करण्याची उदयनराजे यांनी मागणी केली असून, बळाचा वापर करण्याची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

दरम्यान यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, कालची घटना पाहून मी इथे आलोय. शांततेच्या मार्गाने आंदोलन असावं. कालची घटना दुर्देवी आहे. सरकारने दिलेलं आश्वासन पुर्ण केलं नाही. पोलीस या ठिकाणी आणले गेले. लोकांवर लाठीहल्ला करण्यात आला आहे. एका बाजूने चर्चा सुरु ठेवली आणि दुसरीकडे लाठी हल्ला केलाय. तर यात संबध नसलेल्या लोकांवर लाठीचार्ज केलाय. मी हॉस्पीटलला गेलो तेव्हा काही लोकांना छर्रे लागल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनात बळाचा वापर नको करायला होता. शब्द न पाळल्यानं आंदोलन सुरु झालं. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नाही. हवेत गोळीबार करण्यात आले. इथलं उपोषण स्वताच्या फायद्यासाठी नव्हतच. मोठ्या संख्येने पोलीस आणले गेले होते. तर याठिकाणी बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

दरम्यान याचवेळी व्यासपीठावर असलेले उदयनराजे बोलतांना म्हणाले की, ज्यांनी हा प्रकार केला त्यांना निलंबित करण्यात यावे. जखमीच्या उपचार खर्च शासनाने करावा. आरक्षणच्या मागणीसाठी न्यायिक प्रकिया तात्काळ सुरु करावी. आरक्षणाचा मुद्दा हा फार वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं का झालं नाही माहीत नाही. मी काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. तसेच त्यांची आंदोलनकर्ते आणि इतरांची भेट घालून देऊ. आतापर्यंत ५७ महामोर्चा काढले त्यावेळी कुठला अनुचित प्रकार झाला नाह. मोठा समाज आहे त्याकडे दुर्लक्ष केले. शरद पवार, जयंत पाटील सगळ्यांनी एकत्र येवून तोडगा काढावा. गायकवाड कमिशन मधील त्रुटी दूर कराव्यात. क्यूरुटीन पिटीशन दाखल केले आहे, त्यात मदत होईल असं करावं. मराठा समाजाला न्याय मिळत नसेल तर या सारखं दुर्दैव नाही. ज्यांनी हे लाठीचार्जचे आदेश दिले, त्यांचा मी त्रिव निषेध करतो. तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणी करतो. जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते मागे घेण्यात यावेत. ज्या मागण्या मनोज यांनी दिल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे उदयनराजे म्हणाले.

हे ही वाचा: 

Ganeshotsav 2023, पुण्यातील मंडपाची आणि गणशेमूर्तीसाठी महानगरपालिकेने केली नियमावली जाहीर

‘Tiger 3’ चं फर्स्ट पोस्टर आऊट, सलमान आणि कतरिनाच्या लूकने केलं सर्वानांच…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version