सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार हे सातत्याने चर्चेत असतात. या बंडानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ही मिळाले. तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव घेतले. त्यांना तुतारी हे पक्ष चिन्ह मिळाले. त्यांच्या या चिन्हाचे अनावरण आज रायगडावर होत आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला ३ चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यात कपबशी, वटवृक्ष आणि तुतारीचा समावेश होता. निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. शरद पवार या चिन्हाचे अनावरण आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी किल्ले रायगडवर होत आहे. त्यासाठी राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बडे नेते किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. स्वतः शरद पवारसुद्धा कार्यक्रमस्थळी पोहचले आहेत. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलं. चिन्ह अनावराच्या निमित्ताने शरद पवार तब्बल ४० वर्षानंतर रायगडवार गेले आहेत. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं.
रायगड किल्ला चढण्यासाठी अवघड आहे. यामुळे शरद पवार रोप वे च्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर पोहचले आहेत. त्यानंतर पालखीच्या माध्यमातून त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले.रोपे वे ते कार्यक्रम स्थळ जाण्यासाठी बराच अंतर चालत जावे लागते. शरद पवार यांनी इतके चालणे शक्य नाही. त्यामुळे ते पालखीच्या साह्याने कार्यक्रमस्थळी पोहचले. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेचा ताफाही सोबत होता. तर शरद पवारांना (Sharad Pawar) मिळालेले नाव आणि चिन्हही कायम राहू शकतं असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे (Adv. Siddharth Shinde) यांनी व्यक्त केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावरुन शरद पवार गटाची तुतारी फुंकली जाणार आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून ट्विट केले आहे. शरद पवार गटाच्या त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आता अवघा देश होणार दंग,आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग! शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया युजर्सकडून आल्या आहेत. त्यात काहींनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी विरोधात मते दिली आहेत.
हे ही वाचा:
गौरी खानचं नव्या क्षेत्रात पदार्पण,सुरु केलं मुंबईत स्वतःचं पहिलं रेस्टॉरंट
विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी Amit Thackeray यांचा धडक मोर्चा