Navi Mumbai NH 3: ॲक्सेस कंट्रोल मार्गामुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी लागणार फक्त १५ मिनिटे, शहरांतर्गत वाहतूक आता होणार बंद

Navi Mumbai NH 3: ॲक्सेस कंट्रोल मार्गामुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी लागणार फक्त १५ मिनिटे, शहरांतर्गत वाहतूक आता होणार बंद

कल्याण (Kalyan) लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यापैकीच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘नवी मुंबई एनएच – ३ व्हाया कल्याण बदलापूर ॲक्सेस कंट्रोल मार्ग’. या मार्गाच्या उभारणीबाबत एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत या मार्गाच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून हा मार्ग गतीने उभारण्याबाबत उपाययोजना राबविण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

या बैठकीत प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आलेले महत्वाचे मुद्दे :

– बदलापूर (Badlapur), उल्हासनगर (Ulhasnagar), अंबरनाथ (Ambarnath), कल्याण (Kalyan), डोंबिवली (Dombivli) या शहरांना थेट मुंबई तसेच नवी मुंबई या शहरांशी कशा पद्धतीने जोडता येईल. यासाठी मार्गाची उभारणी करण्यात येत आहे.

– या मार्गाच्या रुट बाबत यावेळी ”टाटा कन्सलटींग इंजिनियर ” कंपनीने सुचविलेल्या अनेक पर्यायांवर यावेळी त्यांच्या तज्ज्ञांशी संवाद साधला.

– टाटा मार्फत यावेळी बदलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (तुर्भे – तळोजा – उसाटने आणि खारघर – तुर्भे लिंक रोड) हा रुट ॲक्सेस कंट्रोल मार्गासाठी चांगला पर्याय असल्याचे यावेळी सांगितले.

असा असणार मार्ग :

प्रकल्पाचे फायदे

हे ही वाचा:

विशाळगडावरील निष्कासन कारवाईत उच्च न्यायालयाचा अवमान, जितेंद्र आव्हाड यांनी केला पर्दाफाश

Pooja Khedkar IAS पद गमावणार, प्रकरणावर PMO ची बारीक नजर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version