सरकारमध्ये निवडणुका लावण्याची हिंमत नाही, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लबोल

शिवसेनेत हा गट तो गट असे काहीच नाही. जे गेले ते गद्दार आहे आणि इथे सर्व निष्ठावानच राहिले आहेत. त्यामुळे हे सरकार अल्पावधीत कोसळणार," असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

सरकारमध्ये निवडणुका लावण्याची हिंमत नाही, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लबोल

ठाण्यामध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन ठाकरे गटाचे नेते तसेच युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई, ठाण्यासह राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणूका प्रलंबित आहे. या निवडणुकांवरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच या सरकारमध्ये निवडणुका लावण्याची हिंमत दाखवत नसल्याचा,” टोला हि आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर लगावला. तसेच पुन्हा एकदा त्यांनी हे सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा देखील यावेळी केला. यावेळी ते म्हणाले,”शिवसेनेत हा गट तो गट असे काहीच नाही. जे गेले ते गद्दार आहे आणि इथे सर्व निष्ठावानच राहिले आहेत. त्यामुळे हे सरकार अल्पावधीत कोसळणार,” असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.


ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नरेश मणेरा यांच्यावतीने ठाण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात असून या रोजगार मेळाव्याचे उदघाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार राजन विचारे, खासदार अरविंद सावंत यांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात त्यांनी संबंधित मेळाव्यावरून राज्य सरकारवर टीका केली. यावेळी ते म्हणाले,”ठाण्यात एकीकडे निष्ठावान शिवसैनिकांकडून रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतात तर दुसरीकडे ठाण्याच्याच एका गद्दाराने महाराष्ट्रातील उद्द्योग गुजरातला नेले,” अशी टीका त्यांनी केली.तसेच,”राज्यात काही नवीन चर्चा होत नाही केवळ एकाच कॅसेट वाजवली जात असून यामध्ये कार्यक्रम कोणताही असो त्यात आम्ही सहा महिन्यांपूर्वी काय केले ही एकच टेप वाजवली जाते,” असा टोलादेखील त्यांनी यावेळी लगावला.

रोजगाराची संधी मिळत असेल तर मराठी मुलांनी जगात कुठेही जाण्याची तयारी ठेवावी, असे युवकांना आवाहन केले. यावेळी ते म्हणाले,”शिवसेनेचा जन्म रोजगार आणि स्थानिकांना न्याय देण्यासाठी झाला आहे. पण हे सरकार उद्योग बाहेर पाठवण्याचे काम करत आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, त्यावेळी हेच लोक टेबलावर नाचले होते,” असे म्हणत या मानसिकतेचाही आदित्य ठाकरे यांनी निषेध केला. तसेच,”शिवसेनेची भूमिका स्पष्ट असून हाताला काम देण्याची, रोजगाराची संधी असल्यास मराठी मुलांनी जगात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे,” असाही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी या सरकारमध्ये निवडणुका घेण्याची हिम्मत नसल्याचा देखील आरोप केला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले,”हे सरकार मोगलांचे सरकार आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नाही. तसेच या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात असून राज्यात एवढे प्रश्न असताना तरुणांमध्ये जाती आणि धर्माच्या नावावर भांडणे लावण्यात येत आहेत”, असे आरोप केले. तसेच,”राज्यातील महापालिकांच्या निवडणूक प्रलंबित असताना हे सरकार निवडणूका लावण्याची हिंमत का दखवत नाही?”, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हे ही वाचा:

IND vs SL तिरुवनंतपुरममध्ये भारत आणि श्रीलंका तिस-या वनडेत भिडणार, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार थेट सामना

नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत मोठी बातमी, तांबेंच्या विरोधात शुभांगी पाटील मैदानात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version