रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बस समोरा समोर धडकल्याची घटना समोर आली आहे. या घटने मध्ये २५ ते ३० प्रवासी जखमी झालायची माहिती मिळत आहे. आणि दोन्ही वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात दुखापट झाल्याचे समोर येत आहे, त्यांना आर.जी.पी.एल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमध्ये शाळकरी विध्यार्थींचा सुद्धा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले होते. गुहाघर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरु करण्यात आले.
रत्नागिरीच्या गुहाघर तालुक्यात आज सकाळी दोन बस समोरा समोर धडकून हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. सकाळची वेळ असल्या कारणाने काही विध्यार्ती बस मधून शाळेमध्ये जाण्यासाठी प्रवास करत होते, त्यांना सुद्धा या अपघातात दुखापट झाल्याचे समोर येत आहे. दोन्ही बस चालक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. बस चालकांना आर जी.पी.एल रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे. इतर कजखमी प्रवाश्यान वर उपचार सुरु आहेत.
श्वेता तिवारी मुलीला लग्न करण्याचा का सल्ला देत नाही ?
रत्नागिरी मध्ये पावसाची संततधार सुरूच
काही दिवसं पासून रत्नागिरी मध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. मध्य रात्री पासून पावसाचा जोर अधिक वाढल्याने असल्याने वाहन चालकाला समोरचा अंदाज घेणं थोड अवघड होतं. समोर वळणदार रास्ता आणि पाऊस यात समोरच द्रुश्य दिसणं अवघड झाल्याने अपघात जाळायची माहिती मिळत आहे. हवामान खात्या कडून रत्नागिरी मध्ये ४ ते ५ दिवस अशीच पावसाची संततधार सुरु राहणार आहे असं म्हटलं गेलं आहे. सकाळी सिंधुदुर्ग च्या काही तालुकायत वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाची संततधार सुरुच आहे. पावसाच्या जोरा मुले सर्व नदी आणि नाले दुथडी भरून वाहत आहे. काही ठिकाणांचे जण जीवन विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. काही दिवस रत्नागिरी मध्ये असाच पावसाची संततधार सुरु राहील अशी माहिती हवामान खात्यानी दिली आहे. तिलारी धरणातून तिलारी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात अजित पवारांनी धरलेल्या मौनाचे कारण आले समोर…
पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याच्या कामाला आजपासून सुरुवात