Friday, July 5, 2024

Latest Posts

Vasai Murder Case: सध्याचा कायदा चोर सोडून संन्यासाला फाशी… Sushma Andhare यांनी केला संताप व्यक्त

वसईमध्ये प्रेमप्रकरणातून भररस्त्यात एका तरुणाने तरुणीची डोक्यात लोखंडी पान्याने वार करून हत्या (Vasai Murder Case) केली. यावर आता शिवसेना उबाठा गटाच्या (Shivsena UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही यावर प्रतिक्रिया देत, "सध्याचा कायदा चोर सोडून सन्यासांना फाशी असा असल्याने लोक घटना स्थळी मदत न करता बघत राहतात," असे म्हंटले आहे.

वसईमध्ये प्रेमप्रकरणातून भररस्त्यात एका तरुणाने तरुणीची डोक्यात लोखंडी पान्याने वार करून हत्या (Vasai Murder Case) केली. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून वसई पूर्वेच्या गेवराई पाडा येथे हि घटना घडली आहे. आरोपीचे नाव रोहित यादव असून मृत तरुणीचे नाव आरती आहे. वालीव पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. यावर आता शिवसेना उबाठा गटाच्या (Shivsena UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही यावर प्रतिक्रिया देत, “सध्याचा कायदा चोर सोडून सन्यासांना फाशी असा असल्याने लोक घटना स्थळी मदत न करता बघत राहतात,” असे म्हंटले आहे.

याप्रकरणावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “वसई मध्ये झालेली एका तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना आहे. दिवसाढवळ्या एका तरुणीची भर रस्त्यात हत्या होते आणि लोक बघत राहतात. लोक आजूबाजूंनी जात आहेत परंतु ते लोक नुसते बघत आहेत. हे चित्र संपूर्ण विदारक आहे. सध्याचा कायद्याचा बदगा जो आहे तो चोर सोडून सन्यासाना फाशी की काय अशा प्रकारे वाटायला लागतं. मदत करायला आलेल्या माणसांना आपल्यालाच विनाकारण पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतील की काय असं वाटतं. या भीतीने अशा वादात कोणी पडत नाही. या भीतीने तिच्या मदतीला कोणीही जात नाही. परंतु या निमित्ताने मुंबई लगतच्या भागात जेव्हा अशी घटना घडते तेव्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या शहरालगत इतकी दुर्दैवी घटना घडण हे महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डर वर प्रश्नचिन्ह लावणार आहे.”

समाज माध्यमांवर या हत्येचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून अंगावर काटा आणणारी दृश्ये चित्रित झाली आहेत. आरोपी रोहितने आपल्या एक्स गर्लफ्रेंडवर तब्बल पंधरा वेळा डोक्यात लोखंडी पान्याने वार केले. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती. परंतु, कोणीही त्याला अडवायला गेले नाही. मृत तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळापाशीच राहून मृत आरतीच्या मृतदेहाला जाब विचारत होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून प्रत्येकालाच राग अनावर झाल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा

Vasai Murder Case: तरुणाने भररस्त्यात तरुणीला संपवलं, लोखंडी पान्याने तब्बल पंधरा वेळा डोक्यात केले वार, Devendra Fadnavis यांचे कठोर कारवाईचे निर्देश

शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या भुजबळांना उबाठा गडाचे दरवाजे उघडणार, अजितदादांना गुडबाय!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss