शुक्रवारी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पैठणमध्ये सभा घेतली , सभेत सुषमा अंधारे यानी सांगितले की संदीपान भुमरे यांनी मतदारसंघात विकासकामे करण्यापेक्षा दारूच्या दुकाने थाटण्याचे कामं केली आहेत असे म्हणत रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर जोरदार हल्लबोल केला होता. पण आता सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवर रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी सुद्धा जोरदार हल्लाबोल केला आहे. भुमरे यांनी सांगितलं आहे की अर्ध्यातासाच्या दौऱ्यात सुषमा अंधारे यांना पैठणचा विकास कसा दिसणार असा सवाल भुमरे यांनी केला आहे .तसेच अर्ध्या तासासाठी येऊन बाहेरच्या माणसाने त्याने आम्हाला विकासाच्या गप्पा सांगायच्या हे पटत नाही.
यावेळी बोलतांना भुमरे म्हणाले की, सुषमा अंधारे या पैठण तालुक्यात संध्याकाळी आल्या असल्याने त्यांना काय विकास दिसणार आहे. त्यांचा आणि पैठणचा काय संबध आहे. त्या आल्या कधी, थांबल्या किती दिवस आणि त्यांनी पैठणचा विकास कसा पहिला एवढ्या वेळेत, त्यामुळे आम्ही पैठणमध्ये मुतारी बांधल्या की नाही बांधल्या हे त्यांना कसे कळणार आहे. हेच आरोप स्थनिक माणसाने केले असते तर समजू शकलो असतो. पण अर्ध्या तासासाठी येऊन बाहेरच्या माणसाने त्याने आम्हाला विकासाच्या गप्पा सांगायच्या हे पटत नाही, असे भुमरे म्हणाले.
Bigg Boss 16: शालिन, टीना आणि एमसी स्टॅन यांना बिग बॉसचा धक्का ; पहा काय झालं