छोट्या पडद्यावरी मालिका विश्वातील तुझ्यात जीव रंगला ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पोहचली. या मालिकेमध्ये अभिनेता हार्दिक जोशीने “राणादा” ही भूमिका साकारली होती. आणि अक्षयाने पाठकबाईंची भूमिका साकारली होती. राणा आणि अंजली ही जोडी छोट्या पडद्यावर खूप लोकप्रिय ठरली होती. तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या सेटवर जुळून आलेले प्रेम मग काही वर्ष रीलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर हार्दिक आणि अक्षयाचे आज विवाहसोहळा पार पडला.