दरवर्षी एकतर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये, गणपतीचे आगमन होते आणि मग गणेशोत्सवाला सुरुवात होते. संपूर्ण देशात जरी गणेशोत्सव साजरा होत असला तरी महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी लोकांनी एकत्र यावं त्याच्यात एकता निर्माण व्हावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि हीच सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा अजूनही मुंबईत पाळाली जाते. प्रतिष्ठित भागापासून अगदी गल्लीबोळ्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी लहान – मोठ्या मंडळांद्वारे सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा केला जातो आणि आज मुंबईतल्या काही अशाच सार्वजनिक मंडळांबद्दल आपण जाणून घेणार आहोत: