शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवी अडचण समोर आली आहे. आता कुठे सरकार स्थापन होऊन तीन महिनेच उलटले आहेत. मात्र त्यांना आपल्यासोबत आलेल्या आमदारांच्या नाराजींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ते कॅबिनेटचा दुसरा विस्तार करू शकत नाहीत.
काही विधायक एकनाथ शिंदेंच्या गटातून बाहेर पडले तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या समोर पक्षांतर बंदी कायद्याची भीती निर्माण होईल.
एकनाथ शिंदेंनी ५४ पैकी ४० आमदारांना घेऊन सरकार स्थापन केले आहे आणि सत्ता टिकून राहण्यासाठी कमीत कमी ३७ आमदार सोबत असणे गरजेचे आहे. अन्यथा पक्षांतरबंदी कायद्याची भीती निर्माण होऊ शकते.
पहिल्या कॅबिनेट विस्तारात शिंदेंच्या गटातील 40 पैकी 9 आमदारांना मंत्रिपद मिळालं आहे. अशात इतर आमदारांमध्ये असंतोष पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील आणखी 23 आमदारांना मंत्रिपद मिळू शकते. दुसरीकडे सर्व 31 आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे.
याशिवाय दुसऱ्या कॅबिनेट विस्तारावर भाजपचंही लक्ष आहे आणि आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे दुसरा कॅबिनेट विस्तार शिंदे सरकार एक तारेवरची कसरत ठरणार आहे.
हे ही वाचा:
सीएम एकनाथ शिंदेंचे राज्यपालांना पत्र,१२ एमएलसी जागांसाठी ठाकरेंची यादी फेटाळण्याची मागणी
कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवाच्या महाप्रसादाच्यावेळी शुल्लक कारणावरून झाला गोळीबार
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा