प्रतापगड पायथ्याजवळील (Satara Pratapgad) अफजलखान कबर (Afzal Khan) जवळील अतिक्रमण हटवल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा देखावा असणारा छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Tourism Minister Mangalprabhat Lodha) यांनी या संबंधिती घोषणा केली आहे.
अफझलखानाच्या वधाला यंदा ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अफजलखानाच्या कबरीजवळ ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे त्या ठिकाणी आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत असणारा देखावा असलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. याचसोबत या ठिकाणी लाईट आणि साऊंड शो सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे!#shivpratap #छत्रपतीशिवाजीमहाराज #प्रतापगड pic.twitter.com/SyR0v23av3
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 15, 2022
१९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता. दोन दिवसांपूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आलं. मात्र, तिथे आणखी दोन कबरी आढळून आल्या आहेत. यातील एक कबर ही अफजलखानाचा वकील असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची आहे, असा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचा दहन विधी झाल्याचा उल्लेख असल्याचा दावा हिंदू महासंघाने केला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे.
हे ही वाचा :
मारेकरी आफताब सायको किलर?, श्रद्धाची हत्या, दुसरीशी शरीरसंबंध, तर तिसरीला…
मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर