अभिजित बिचुकले यांनी पंतप्रधान मोदींना काळजी घेण्याचा दिला सल्ला

अभिजित बिचुकले यांनी पंतप्रधान मोदींना काळजी घेण्याचा दिला सल्ला

सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद प्रचंड तापला आहे. त्यात काल बेळगाव (Belgaum) मध्ये हिरबागेवाडी (Hirbagewadi) टोला नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही गाड्यांवर दगड फेक करण्यात आली आणि महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. या घटनेचे पडसाद आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसून आले. ठाकरे गट, राष्ट्रवादी, मनसे आणि विविध संघटना आक्रमक झाल्याचे दिसून आलं. याच वेळी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कर्नाटकच्या बसेसला काळे फासण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.

आता यासगळ्यात टीव्ही मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी आणि बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेनं (Abhijit Bichukale) नेहमी प्रमाणे प्रतिक्रिया देत लक्ष वेधून घेतले आहे. शेवटी मलाच महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न वादात लक्ष घालावे लागेल. अशी प्रतिक्रिया देत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नेहमी आपल्या बिनधास्त आणि परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे बिचुकले यांच्या त्या वक्तव्याची सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून दखल घेतली जात आहे. भाजपमधल्या काही लोकांना पंतप्रधानांचं स्वप्न पडलं असून ते आता मोदींना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा मोदींना सल्ला काळजी घ्या, असं म्हणत बिचुकले यांनी पंतप्रधान मोदींना काळजीचा सल्ला दिला आहे.

सोशल मीडियावर (social media) बिचुकलेंची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, कर्नाटक सीमावाद जर लवकर थांबवला नाही तर छत्रपती संभाजीराजे कर्नाटकात जाणार आहे. केवळ जाणार नाही तर तिथे आंदोलनही करणार असल्याचे त्यानं म्हटले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी बिचुकलेंना दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात केंद्रात एकाच पक्षाच सरकार आहे. त्यामुळे हा प्रश्न येत्या काळात सुटायला हवा. असेही त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

Watch video तिने हिंमत सोडली नाही, लढत राहिली आणि अखेर संकटातून बाहेर पडली, पहा व्हिडिओ

वंचितचे हाजी अस्लम सय्यद यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version