बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. पूजा भट्ट हैदराबादमध्ये राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत दिसली. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आणि फिल्म मेकर पूजा भट्ट तेलंगणाची राजधानी हैदराबादला पोहोचली आहे. जिथे पूजा भट्टसह काँग्रेस नेते राहुल गांधी या यात्रेत सहभागी झाले होते.
भारत जोडो यात्रेत सहभागी होणारी पूजा भट्ट पहिली बॉलिवूड सेलिब्रिटी ठरली
भारत जोडो यात्रेत सामील होणारी पूजा भट्ट पहिलीच बॉलिवूड सेलिब्रिटी आहे. अभिनेत्री पूजा भट्टनं यावेळी फुल स्लीव्हजचा काळ्या रंगाचा कुर्ता आणि प्रिंटेड स्टोल परिधान केला होता. पूजानं हात हलवून समर्थकांचं स्वागत केलं. यादरम्यान अभिनेत्रीला पाहण्यासाठी गर्दी झाला होती. या यात्रेत सहभागी होण्यापूर्वीच राहुल गांधींनी ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टने काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’बद्दल ट्विट केले होते.
Actress-filmmaker Pooja Bhatt briefly joins the Congress party’s Bharat Jodo Yatra. The Yatra resumed from Hyderabad city in Telangana this morning.
(Source: AICC) pic.twitter.com/eIBiFQaLXi
— ANI (@ANI) November 2, 2022
हेही वाचा :
Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीच्या आयोजनावरून वादाचा आखाडा
राहुल यांनी मंगळवारी हैदराबादच्या चारमिनारसमोर राष्ट्रध्वज फडकावला होता. सुमारे ३२ वर्षांपूर्वी गांधीजींचे वडील आणि तत्कालीन पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांनीही चार मिनारसमोरून ‘सद्भावना यात्रा’ सुरू केली होती. यावेळी राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिले.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना राहुल गांधींनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “३२ वर्षांपूर्वी पापा यांनी चारमिनार येथून सद्भावना यात्रा सुरू केली. त्यांनी भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. मानवतेची सद्भावना. सर्वात अनोखे मूल्य. मी. , आणि काँग्रेस पक्ष कोणत्याही फुटीरतावादी शक्तीचा सामना करून तो खंडित होऊ देणार नाही.”
Thackeray Vs Shinde : शिंदेंच्या ४० आमदारांना उद्धव ठाकरे शिकवणार धडा? काय आहे ‘मिशन ४०’?
स्वरानं भास्करनं केलेलं राहुल गांधींचं कौतुक
अभिनेत्रीनं ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, “निवडणुकीत पराभव, ट्रोलिंग, वैयक्तिक हल्ले आणि सतत टीका होत असतानाही राहुल गांधी ना तेढ वाढवणाऱ्या वक्तव्यांना बळी पडले, ना राजकारणाला बळी पडले. या देशाची स्थिती पाहता भारत जोडो यात्रेसारखा प्रयत्न कौतुकास्पद आहे.”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सज्ज; पुण्यात ३५०० ‘राज’दूतांची नेमणूक