Kolhapur : शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांची ‘निष्ठा’ व ‘शिवसंवाद’ हि गेले दोन दिवस सुरु आहे. या दरम्यान आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन राज्य सरकार वर हल्लाबोल करत आहेत. त्यांनी कोल्हापूरमधून जयसिंगपूरला रवाना होण्यापूर्वी पुन्हा एकदा बंडखोरवर चांगलीच फटकेबाजी केली आहे. “गद्दाराचे खरे चेहरे आता दिसू लागले आहेत. ठाकरे कुटुंबाला एकटे पाडण्याचा कट सुरु आहेय, पण राज्यातील जनता कधीच आम्हाला एकटे पाडू देणार नाही, असा इशारा त्यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांना दिला आहे.
हेही वाचा :
Ajit pawar Live: पूरग्रस्तांची चिंता सरकारला नाही ; अजित पवार
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, “आदित्य ठाकरेंविषयी प्रेम आहे, आदित्य आम्हाला मुलाप्रमाणे आहे असं म्हणत होते. आता त्यांच्या मनातील खरे विचार लोकांसमोर येत आहेत. त्यांना कारवाई टाळायची होती म्हणून ते स्वतःला शिवसैनिक म्हणत होते. आता तुम्ही त्यांचे खरे चेहरे बघत आहात, गद्दार हा गद्दारच असतो. तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. सध्या कोणताही राजकीय पक्ष आनंदी नाही. गद्दारीचा हा पॅटर्न इतर राज्यात जायला लागला तर देशात अस्थिरता निर्माण होईल,” असे स्पष्ट मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
आज शिवसेनेच्या ‘शिवसंवाद’ यात्रेची सुरुवात कोकणातील कुडाळ येथून झाली. येथे उपस्थित शिवसैनिकांसोबत संवाद साधला. pic.twitter.com/K9Mb0PisfV
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 1, 2022
पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्यान’चं उद्घाटन रद्द, स्वयंसेवी संस्थांचा हस्तक्षेप