‘हीच ती वेळ’ आदित्य ठाकरेंचे युवासेनेला आदेश

सध्या राज्यभरात गेले काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे.

‘हीच ती वेळ’ आदित्य ठाकरेंचे युवासेनेला आदेश

मुंबई : सध्या राज्यभरात गेले काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. गावांमध्ये पाणी शिरले आहे. धरणे, नद्या, नाले, तलाव ओसंडून वाहत आहे. या पूर परिस्थितीमध्ये राज्यभरात 1 जून पासून 100 हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. यास पार्श्वभूमीवर राज्याचे माजी पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी पूर परिस्थितीबाबत युवासेनेला आवाहन केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून ट्विट करत युवासेनेला ‘हीच ती वेळ’ असं म्हणत मार्गदर्शन केले आहे. “आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष देता जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा” असे युवा सेनेला आदित्य ठाकरे यांनी आवाहन केले.

हेही वाचा : 

दे धक्का 2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Exit mobile version