रोहित पवारानंतर सुप्रिया सुळे धीरेंद्र कृष्ण महाराजांवर संतापल्या

रोहित पवारानंतर सुप्रिया सुळे धीरेंद्र कृष्ण महाराजांवर संतापल्या

काही दिवसांपासून धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) हे चांगलेच चर्चेत राहिले आहेत. मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आता आणखी एक नव्या वादात सापडल्याचे दिसत आहे. कारण, त्यांनी संत तुकाराम (Saint Tukaram) महाराजांबद्दल एक जाहीर व्याख्यानात वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या पत्नी त्यांना रोज मारहाण करायच्या असे विधान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले आहे. त्यांच्या याच विधानानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या या विधानाचा निषेध आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या आज (२९ जानेवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral video) ते संत तुकाराम (Saint Tukaram) महाराज यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केला आहे. “संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते.” असे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणाले.

दरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या या विधानावर भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असे तुषार भोसले म्हणाले आहेत. “बागेश्वर धाम तथा धीरेंद्र शास्त्री यांनी तुकाराम महाराजांबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिला आहे. त्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. हा फक्त संत तुकाराम महाराज नव्हे तर सबंध महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही मागणी करतो की धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची तसेच महाराष्ट्राची माफी मागावी,” अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे.

हे ही वाचा:

कसबा पोटनिवडणूक जाहीर अन् भाजपकडून आचारसंहितेचा भंग

भाजपचा सत्यजित तांबेना छुपा पाठिंबा, राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version