spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Akshay Shinde Encounter: कुणालातरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी घेतला आहे का? Prakash Ambedkar

Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याप्रकरणात विरोधकांनी संशय व्यक्त करत सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही यावर मोठे भाष्य केले असून ‘याप्रकरणात कुणालातरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी घेतला आहे का ?’ अशी शंका उपस्थित केली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “बदलापूरमधील मुलींवर झालेल्या अतिप्रसंग प्रकरणार अगोदर आरोपीला शोधण्यात शिंदे, फडणवीस सरकार कमी पडले. अनेक दिवस आरोपीला पकडण्यात आले आहे. जो काही एफआयआर नोंदवला गेला होता तो चुकीचा होता. एफआयआर मध्ये दुरुस्ती झाली पाहिजे याची माहिती देण्यात आली. पहिल्यापासूनच आरोपी आणि मदतनीस कसे मोकळे सुटतील हा प्रयत्न करण्यात आला होता. आरोपीला दुसऱ्या केस मध्ये चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने रिव्हॉल्व्हर हिसकावली तीन फायरींग केल्या आणि त्यात एक पोलीस जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी ज्या पोलिस अधिकाऱ्याला गोळी लागली आहे, खरी माहिती समोर यावी यासाठी शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट सादर करावा. जेणेकरुन त्याला गोळी कुठे लागली आहे हे लोकांना कळेल. आता ज्या केस मध्ये आरोपीला चौकशीसाठी घेऊन जात होते, त्याच्या बायकोच्या तक्रारीबाबत त्याला घेऊन जात होते, नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते त्याचा खुलासा करावा. जर याबाबत शासनाने खुलासा केला नाही तर मग कुणालातरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी घेतला आहे का? ही शंका कायम राहील,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “सरकारने वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी अशी विनंती करतो, ज्यात संशय राहणार नाही. फायरींग करणारा माणूस समोरा-समोर फायर करतो पण ती गोळी मांडीला कशी लागली हा प्रश्न निर्माण होतो? अनेक प्रकार त्या शाळेत घडले आहेत, आरोपी ते ओपन करणार होता का? अनेक संशय आहेत. त्यामुळे मेडिकल रिपोर्ट आणि सायंकाळच्या सुमारास कुठे घेऊन चालले होते याचा खुलासा करावा. बदलापूर मधील आरोपी आहे, तो गुन्हा सिद्ध झाला नाही, कायदा का फॉलो केला नाही? आपण म्हणतो कोर्टात घेऊन जा, कोर्टाला सांगू द्या की तो गुन्हेगार आहे… आज गुन्हेगार आहे म्हणून वापरले गेले, उद्या सामान्य माणसाचं काय? असा प्रश्न निर्माण होईल,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: आधी भरचौकात फाशी देण्याची मागणी मग आता त्या नराधमाविषयी एवढी आपुलकी कशी वाढली? Naresh Mhaske यांचा सवाल

Akshay Shinde Encounter: असे अजून दहा-पंधरा ठोकले तरी काय हरकत नाही पण…काय म्हणाले Nilesh Rane?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss