Akshay Shinde Encountr: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याप्रकरणात विरोधकांनी संशय व्यक्त करत सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यावर आता शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विरोधकानावर जोरदार टीका केली आहे.
उदय सामंत यांनी आज (मंगळवार, २४ सप्टेंअबर) यावर भाष्य करत महाविकास आघाडीच्या नेत्यावर निशाणा साधला आहे. “अत्याचाराचे मतांसाठी भांडवल करायचे आणि आता पुन्हा एकदा राजकारण करुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचा हे दुर्दैवी आहे,” असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
उदय सामंत यावेळी म्हणाले, “काल पोलिसांवर अक्षय शिंदे याने पिस्तुल घेऊन फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संरक्षणार्थ जो गोळीबार झाला त्यामध्ये अक्षय शिंदे हा मृत पावला अशी प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी होईल, त्यामधून जे काही आहे ते निष्पन्न होईल. जो अक्षय शिंदे यात मारला गेला आहे तो काही सज्जन माणूस नव्हता. पंधरा वीस दिवसांपूर्वी त्याच नराधमाने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले होते. त्यावेळी आज मुलाखत देणारे सगळे सांगत होते की त्याला फाशी दिली पाहिजे. त्या प्रसंगाचे राजकीय भांडवल करण्याचे काम महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी केले. महाराष्ट्रातील जनतेसमोर महाविकास आघाडीचा दुटप्पीपणा समोर आला आहे. एखाद्या चिमुरड्या मुलीच्या अत्याचाराचे मतांसाठी भांडवल करायचे आणि आता पुन्हा एकदा राजकारण करुन सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचा हे दुर्दैवी आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?