सर्व देवी-देवता हिंसक आहेत, कालिचरण महाराज यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

सर्व देवी-देवता हिंसक आहेत, कालिचरण महाराज यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

आपल्या वक्तव्यावरून नेहेमी चर्चेत राहणारे कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा वादग्रस्त वक्त्यव्य केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल (Mahatma Gandhi) अपशब्द उच्चारणाऱ्या कालीचरण महाराज यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असे कालीचरण महाराज म्हणाले आहेत.

कालिचरण महाराज यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना हिंदू धर्मातील देव देवातांचे संदर्भ देत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj), गुरु गोविंदसिंग महाराज (Guru Gobind Singh Maharaj), राणा प्रतापसिंह महाराज (Rana Pratap Singh Maharaj) यांनी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पुजले असता का? असा प्रश्न त्यांनी आपल्या भक्तांना विचारला आहे. आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यामुळेच आपण त्यांची पूजा करतो. तर हिंदू धर्मातील (Hindu religion) देवी देवतांनी आपल्यासाठी मारामाऱ्या केल्याच नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का? त्याचबरोबर धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असंही ते यावेळी बोलताना म्हणाले आहे. हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक असल्याचे सांगत धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असं वक्तव्य त्यांनी कार्यक्रमात केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

“आपले सगळे देवी-देवता हिंसक आहेत. उद्देश देश, धर्मासाठी असेल तर खून करणे काही वाईट नाही,” असेही कालीचरण महाराज म्हणाले आहेत. यापूर्वी कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर केला होता. तसेच गांधीजींना शिवीगाळ करताना मारेकरी नथुराम गोडसेला वंदनही केले होते. याबाबतची एक व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. याप्रकरणी कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल आहे.

हे ही वाचा : 

हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, ठाकरे गट होणार आक्रमक

चीन कोरोना रुग्ण संख्या लपवतोय ? कोरोना रुग्ण संख्या जाहीर न करण्याचा चीनचा निर्णय

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version