सर्व तयारी झाली आहे, केसरकरांनी लवकरच तुरुंगात जाण्याची करावी, संजय राऊतांच्या इशारा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना लवकर तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा दिला आहे.

सर्व तयारी झाली आहे, केसरकरांनी लवकरच तुरुंगात जाण्याची करावी, संजय राऊतांच्या इशारा

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि शिवसेना दुभंगली गेली. तेव्हा पासून शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते नेहमी एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात. आजही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना लवकर तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा दिला आहे.

संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना केसरकारांना हा इशारा दिला आहे. यावेळी बोलताना राऊत म्हणाले,”आम्ही तुमच्यासारखे लफंगे नाही,पळपुटे नाही. आम्ही आमच्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला तयार आहोत. दीपक केसरकर मला तुरुंगात पाठवण्याची भाषा करतात. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही, तुम्ही म्हणजे कायदा नाही. सर्व तयारी झाली आहे, २०२४ मध्ये तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी”,असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या अवमानावरून महाराष्ट्रात चालू असलेल्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली. “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वाद असू नये. महाराष्ट्राच्या इतिहासात या दोन छत्रपतींचं मोठं योगदान आहे. इतर राज्यांना भूगोल आहे मात्र,महाराष्ट्राला इतिहास आहे आणि तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले,.

याचविषयावर पुढे बोलताना संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर देखील भाजप आणि मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. संजय राऊत म्हणाले, ” जे आता संभाजी महाराज्यांच्या अपमानावर बोंबा मारत आहेत, ते शिवाजी महाराज्यांच्या अपमानाविषयी का मूग गिळून गप्पा आहेत? राज्यपालांच्या दारावर जाऊन ते आंदोलन का करत नाहीत? राज्यपालांना हटवण्याची मागणी का करत नाहीत?राज्यपालांना माफी मागण्यासाठी का सांगत नाही? त्यांच्या दिल्लीतील प्रवक्त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यावर का बोलत नाहीत? संभाजी महाराजांबद्दल आम्ही देखील भावनाशील आहोत. मात्र शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वराजासाठी मोठा संघर्ष केला. त्याच शिवाजी महाराजांचा भाजपने आणि राज्यपालांनी अपमान केला. त्यावर भाजप आणि सध्याचे मुख्यमंत्री का गप्प आहेत ?

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज मुंबईमध्ये येऊन मुंबईतील काही उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. यावर ते म्हणाले,”मुंबई बिसनेस सेंटर आहे. आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबई आणि महाराष्ट्राचं योगदान घेत असतील तर त्याला विरोध करण्याची गरज नाही. पण त्यांनी महाराष्ट्रासोबतच गुजरातला देखील जावं. एखाद्या राज्याचा मुंबई, महाराष्ट्रामुळे विकास होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे,”असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

कर्मचारी आणि जनता वाऱ्यावर, महाराष्ट्र खड्यात टाकण्याचं षडयंत्र!, केदार दिघेंचा हल्लबोल

शिव ठाकरेची सोशल मीडियावर हवा!, म्हणतो स्वप्न…

चित्र वाघ यांच्या पोलीस तक्रारीनंतर उर्फीची पोस्ट व्हायरल, माझ्या मनात आत्महत्येचे विचार…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version