राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी पसरल्याची सर्वत्र चर्चा आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे सर्व महत्त्वाची खाती हे राष्ट्रवादीच्या वाटेला जातील, अशी शिवसेना आमदारांची तक्रार असल्याची चर्चा आहे. अशातच आता राज्याचे राजर्जरण वेगळी कलाटणी घेतं की काय असे चित्र आहे. दरम्यान शिवसेनेच्या गोटात सध्या प्रचंड धुसफूस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात सातत्याने बैठकांचं सत्र सुरु आहे.विशेष म्हणजे भाजपकडून आता शिवसेनेची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची काल महत्त्वाची बैठक पार पडली. त्यातनंतर रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिवसेनेची नाराजी आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता या बैठकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये नंदनवन बंगल्यावर बैठक पार पडली अशी माहिती समोर आली आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या उलथापालथी या होत आहेत. दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड ही घडली आणि त्यामुळे राज्यातील वातावरण हे पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून काढता पाय घेत बंड केला. आणि आता पुन्हा एक वर्षांनंतर राज्यात मोठा बंड हा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी बंड केला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप घडवला. येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काय बघायला मिळेल आणि कोणते नव-नवीन भूकंप होतील यावर आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
नेत्यांच्या कुंडलीत दडलंय काय? | Time Maharashtra | Maharashtra Politics
Salaar चा धमाकेदार टीझर आऊट, प्रभासचा लूक पाहून अंगावर शहारे…