शिंदे गटाचे आमदार अखेर तब्बल 11 दिवसांनंतर मुंबईत परतले. बंडखोर आमदारांना मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच आपआपल्या मतदारसंघात परतण्याची मुभा दिली जाणार आहे. मुंबईत येताच शिंदे गटाच्या आमदारांची व भाजप आमदारांची पहिली बैठक पार पडली. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान मतदान सुरु आहे. भाजप कडून राहुल नार्वेकर यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता. विधानसभेत आता निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे. शिंदे गटाने शिवसेने कडून जाहीर केलेला व्हीप पाळला नाही. शिंदे गटाकडून राहूल नार्वेकर यांना आतापर्यंत १६४ मतं पडली आहेत. त्यामूळे त्यांना बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.