आशिष शेलारांनी केला शिवसेनेवर गंभीर आरोप

आशिष शेलारांनी केला शिवसेनेवर गंभीर आरोप

महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसांपासून वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प बहुचर्चित आहे. सत्ताधारी आणि विरोधक आपसात भिडले आहेत. आशिष शेलारांनी सुरुवातीपासूनच वेदांत प्रकल्पावरून शिवसेनेला निशाण्यावर घेतलं आहे. आज पुन्हा एकदा आशिष शेलारांकडून शिवसेनेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वेदांता कंपनीकडे टक्केवारी मागितल्याचा गंभीर आरोप भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. शेलारांनी ट्विटमधून शिवसेनेला अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारला आहे.

तर शिंदे आणि भाजपसुद्धा विरोधकांवर चांगलीच टीका करत आहे. महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे गेल्याचा आरोप सरकारकडून करण्यात येत आहे. तर आज भाजपाचे प्रदेश अध्य्क्ष आशिष शेलार यांनी गंभीर आरोप करण्यात आले आहे. आशिष शेलार यांनी वेदांता कंपनीकडे टक्केवारी मागितल्याचा आरोप केला आहे. शेलारांनी ट्विटमधून शिवसेनेला अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारला आहे. वेदांताचा हा मोठा प्रकल्प हातातून निसटल्याने आधीच मोठा गदारोळ सुरू आहे. त्यात आता आशिष शेलारांच्या आरोपांमुळे आता वादाची नवी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीचं सरकार आणि आत्ताचं सरकार दोघेही हा प्रकल्प जाण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलताना दिसत आहेत. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र याबद्दल मोदींशी संवाद साधला आहे. त्यावर मोदींनी महाराष्ट्राला यापेक्षा मोठा प्रकल्प देण्याचं आश्वासन दिल्याचा दावा शिंदेंनी केला आहे.

हे ही वाचा:

भारतात ७० वर्षांनंतर चित्त्याची चाल दिसणार

नक्की काय आहे भारताचं ‘प्रोजेक्ट चित्ता’?

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version