राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या बंडावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहीत पवार म्हणाले की, “हे सर्व पाहता इतर ठिकाणी हे प्रकार यशस्वी होऊ शकतात, पण महाराष्ट्रात हे जमणार नाही. कारण लोक हे जमू देणार नाहीत. लोकनेत्यांनी सुरू केलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष भाजपाला महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्यापासून रोखू शकत होत्या. हे भाजपाला माहिती असावं म्हणून राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला.
विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, “गेल्या काही वर्षात निवडणूक आयोग सत्तेतील लोकांची बाजू घेते, असं मत सामान्य लोकांचे झाले आहे. निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून ती एक प्रक्रिया आहे. ती पूर्ण करत असताना दोन्ही बाजुचे गट ताकद लावतील आणि युक्तीवादही होईल. पण निवडणूक आयोग कोणाच्या बाजुने निर्णय देईल, याचा अंदाज सर्वांना आहे. आम्ही न्यायालयात जात लढाई लढू. पण, येत्या काळात लढत असताना चिन्ह राहिलं नाही, तरी लोकांनाच विचारावे शरद पवार यांना कोणतं चिन्ह मिळालं पाहिजे. ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावं लागणार, याचा अंदाज आला आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं. त्यामुळे चिन्हापेक्षा विचार महत्वाचे आहेत. शरद पवारांबरोबर राहून लढतोय हे आमच्यासाठी महत्वाचं आहे,” असेही रोहित पवार यांनी सांगितलं.
राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षातून अजित पवार यांनी देखील बंड केले आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये सत्तेत जाऊन बसले. अजित पवारांसह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावरून निवडणूक आयोगाने बुधवारी २६ जुलै शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला नोटीस बजावली आहे. आणि म्हणूनच रोहित पवार यांनी यावर थेट भाष्य केले आहे. अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली महत्वाची माहिती
G-२० बैठकीत नेमके काय झाले बोलणे ?