विधान परिषदेत आम्हीच जिंकणार मुख्यमंत्र्यांनी केलं वक्तव्य

निवडणूक आम्हीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्हीच जिंकणार, मला मुळीच चिंता वाटत नाही.

विधान परिषदेत आम्हीच जिंकणार मुख्यमंत्र्यांनी केलं वक्तव्य
महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे केंद्राच्या सत्तेचा माज चालणार नाही, विधान परिषदेत आम्हीच जिंकणार. शेरास सव्वाशेर भेटतोच या शब्दांत भाजपला सुनावत राज्यसभा निवडणुकीतील पराभवाचा  विधान परिषद निवडणुकीत काढण्याचा निर्धार मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ठाकरे यांनी सध्या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन केले.
निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखविणारी आहे. महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे आपल्याला देशाला दाखवायचे आहे, असे आवाहनही त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना केले. निवडणूक आम्हीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ठाकरे म्हणाले की, उद्या आम्हीच जिंकणार, मला मुळीच चिंता वाटत नाही. आता शिवसेनेत गद्दार मनाचा कुणी अजिबात राहिलेला नाही. सत्तेचा माज हवा असेल तर जा भाजपकडे; पण हे किती दिवस चालणार? आज मी शेर आहे, पण उद्या कुणीतरी सव्वाशेर येणार आहे.
आत्ताचं राजकारण हे पावशेर आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मी मुख्यमंत्री असलो नसलो तरी काहीही फरक पडत नाही; पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावर समोरचा माणूस आदराने उभा राहतो, हे कोणीही काढून घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना मी विधानपरिषदेची उमेदवारी दिली नाही; पण कोणतीही धुसफूस न करता ते निष्ठेने याठिकाणी आले आहेत, असे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांनी केले.
Exit mobile version