spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवारांची ‘जोडे मारो’ आंदोलनावरुन टीका; म्हणाले “जर हिंमत असेल तर समोर या”

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय. नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ३५ फुट्याच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी शिवरायांच्या या भव्य पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. पण अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला. हा पुतळा २६ ऑगस्टला दुपारी १ च्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. या घटनेमुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली. विरोधक राज्य सरकारवर तुटून पडले. याच प्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असताना या प्रकरणी माफी देखील मागितली आहे. परंतु या मुद्यावरून प्रतिक्रिया येणं काही मात्र थांबत नाहीय. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांनीही याबद्दल आक्रमक पावित्रा घेतला आहे. या घटनेनंतर काल महाविकासआघाडीचे नेते रस्त्यावर उतरले. महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून काल (१ सप्टेंबर) मुंबईतील गेटवे परिसरात जोडे मारा आंदोलन करण्यात आले. आता या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. ते बारामतीत बोलत होते.

बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा पार पडत आहे. यावेळी अजित पवारांनी भाषण केले. या भाषणावेळी अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन राजकारण करु नका”, असा सल्लाही विरोधकांना दिला. “आता लवकरच बारामतीत कॅन्सर रुग्णांसाठी रुग्णालय काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधान बदलणार असा चुकीचा प्रचार केला गेला. मला तुम्ही पाच वर्ष निवडून दिलं आहे, त्यामुळे आता पुढे काय करायचं, हे तुम्ही ठरवा. मी केलेल्या कामाचे पुस्तक काढून तुम्हाला देणार आहे”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

“राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जे घडायला नको हवं होतं. मी त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. पण यात ज्या कोणाची चूक असेल, त्याला शोधून काढू. ज्याने बांधकाम केलं किंवा ज्याने स्ट्रक्चरल ऑडिट देणारा जो कुणी चुकीचा असेल त्याला शोधायचं आणि शिक्षा करायची. त्यानंतर परत महाराजांच्या नावाला साजेसं भव्य स्मारक पुन्हा उभारण्यात येईल”, असे अजित पवार म्हणाले. यानंतर अजित पवारांनी विरोधकांच्या आंदोलनावरही निशाणा साधला. “या घटनेचे विनाकारण राजकारण करु नका. आता काहींनी जोडे मारो आंदोलन केले, आमच्या फोटोला जोडे मारलेत, अरे कसे जोडे मारतात. जर हिंमत असेल तर समोर या. मीही बघतो. हा कसला रडीचा डाव खेळताय”, अशा भाषेत अजित पवारांनी विरोधकांना सज्जड दम भरला.

हे ही वाचा:

महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन होणार, बच्चू कडूंनी केला मोठा दावा

मालवण मध्ये जे झाले ते महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न; Devendra Fadnavis गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss