संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बुधवारी दिवसभरात राऊतांना धमकीचे दोन फोन (Death Threats Calls) आले. राऊतांना फोनवरून धमकी मिळाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सध्या राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटलेला दिसत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्ला चढवत हे सरकार नामर्दच असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणीही राऊतांनी केली होती. शिंदे-फडणवीस सरकार हे दिल्लीच्या दारातील पायपुसणं आहे, असं म्हणत राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवल निशाणा साधला होता. तसेच शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर (Maharashtra Karnataka Border Dispute) आजच्या सामनातून शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात आली आहे. कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) महाराष्ट्राकडे पाहून पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे भुंकत आहेत आणि स्वत:ला ‘भाऊ’ म्हणवून घेणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या नांगी टाकतायत, असं सामनामध्ये लिहिलं आहे.

शिंदे गटाचे (Shinde Group) नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शंभूराज यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून टीका केली होती. हे सरकार नामर्द असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. यानंतर राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं थांबवावं, नाहीतर त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं शंभूराजे यांनी म्हटलं होतं. या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version