spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दीपक केसरकरांनी दिला चंद्रकांत पाटलांना सल्ला

बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी एका टीव्ही मुलाखतीत केलं होतं. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. "मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते," असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते

बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी एका टीव्ही मुलाखतीत केलं होतं. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. “मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मी अशा अर्थाने बोललो नसल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबईतील हिंदू जिवंत राहिला. यापूर्वी अनेक वेळा बाळासाहेबांचं नाव मी आदरानेच घेतलं आहे आणि ऋणही व्यक्त केलं आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात कधीही अनादर नव्हता. आणि कधीही नसेल.

चंद्रकांत पाटलांसारख्या (Chandrakant Patil ) ज्येष्ठ नेत्याने बोलताना 100 टक्के भान ठेवलं पाहिजे, असा सल्ला शिवसेनेचे नेते (शिंदे गट) दीपक केसरकर यांनी दिला आहे. बाबरी मशिद विद्ध्वंसावरुन (Babri Masjid Demolition) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. “राजकारणात स्थान टिकवायचं असेल तर संयमाने बोलावं लागतं,” असंही केसरकर म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल मुख्यमंत्री आणि अमित शाहांनी आधीच नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांचे कान टोचले आहेत. यापुढे बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असं केसरकर म्हणाले.

त्याचबरोबर दीपक केसरक यांनी उद्धव थार्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “बाळासाहेबांच्या नावावर आम्ही तुम्हाला देखील प्रेम दिलं. तुम्ही विचार सोडला तेव्हा आम्ही तुम्हाला सोडलं, असं केसरकर म्हणाले. ज्येष्ठ शिवसैनिकांना कधीही उद्धव ठाकरे भेटले नाहीत, मोदी साहेबांवर कायम टीका करताना तुम्ही दिसता. मातोश्रीचा मान देखील तुम्ही संपवला आहे. सहानुभूतीची लाट निर्माण करणं आणि कार्यकर्त्यांना सोबत ठेवायचं एवढंच काम यांच्याकडे राहिलं आहे, असा थेट हल्लाबोल त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

हे ही वाचा : 

बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा संजय राऊत

राजकणार भूकंप?, अजित पवार भाजपाबरोबर जाणार? अंजली दमानियांचे ‘ते’ ट्वीट होतंय जोरदार व्हायरल

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, महाविकास आघाडीचे मतभेद समोर येऊ लागल्याने ठाकरे पवारांची महत्त्वपूर्ण बैठक?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss