व्होट जिहादमुळे लोकसभेत पराभव, Devendra Fadnavis यांचा मोठा दावा

व्होट जिहादमुळे लोकसभेत पराभव, Devendra Fadnavis यांचा मोठा दावा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात ठिकठिकाणी दौरे, सभा, बैठका आणि यात्रा पार पाडल्या जात आहेत. अश्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सभा काल (सोमवार ३० सप्टेंबर) कोल्हापूर येथे पार पडली. यावेळी उपस्थितांसमोर भाषण करताना फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात व्होट जिहाद झाल्याचा खळबळजनक दावा केला असून आता यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांच्या यावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या असून यावरून अंतराजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

‘लोकसभा निवडणुकीत ४८ मतदारसंघांपैकी १४ मत्तदारसंघ आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्होट जिहाद झाला असल्याचा गंभीर दावा फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मिळालेल्या अपयशाच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात केलेले मतदान. यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी पावले उचलल्याचे स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडीला मिळालेल्या मुस्लिम मतदानावरून टीका करत ‘व्होट जिहाद’ झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

कोल्हापूर येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद पाहायला मिळाले. धुळे लोकसभेच्या सहापैकी पाच मतदारसंघात आघाडीवर असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य मतदारसंघात १ लाख ९४ हजार मतांनी मागे जातो आणि त्याचा चार हजार मतांनी पराभव होतो. निवडणुकीत हर जीत महत्वाची नाही… कधी हा पक्ष जिंकेल तर कधी तो पक्ष जिंकेल… मात्र, संघटित मतदान करून हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो, असा काही लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो आहे. लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला असून २८ पैकी १४ मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version