“मी पुन्हा येईन म्हणत हिणवणाऱ्यांचा मी बदला घेणार” : देवेंद्र फडणवीस

भाजप-शिंदे गट सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून राज्यातील नवीन सरकारवर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

“मी पुन्हा येईन म्हणत हिणवणाऱ्यांचा मी बदला घेणार” : देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाजप-शिंदे गट सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून राज्यातील नवीन सरकारवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचे वर्णन केले. आणि तोंडभरुन कौतुक देखील केलं. तसेच यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन वाक्यावरुन हिणवणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही असे म्हटल्यानंतर अनेकांनी माझी टिंगलटवाळी केली. मी पुन्हा येईन म्हटलं होते. मी पुन्हा आलोच नाही तर यांनाही घेऊन आलो आहे. ज्यांनी अपमान, टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार. मी त्यांना माफ केलं हाच माझा बदला आहे. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. सर्वांना संधी मिळते,” असे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांचा मविआला तोला

मोदीजींनी दाखवून दिले की सत्ता महत्वाची नाही. मात्र आम्हाला बहुमत असतानाही सत्तेपासून दूर राहावे लागले. आता आम्ही, पुन्हा सरकार बनवले आणि जनतेची इच्छा पूर्ण केली. ज्या पक्षाने मला सर्वोच्च स्थानावर बसवले त्या पक्षाने मला घरी बसण्याचाही आदेशही दिला असता तरी मी बसलो असतो, असेही फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले.

हेही वाचा : 

मुख्यमंत्र्यांना पेढे भरवण्यावरून शिवसेनेनं राज्यपालांवर केली जळजळीत टीका

Exit mobile version