spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Aaditya Thackeray तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलात, तुम्हाला शेती माहित नाही: Dhananjay Munde

मराठवाडा आणि विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. सामान्य नागरिकांनाही पावसामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अश्यातच युवासेनाप्रमुख आणि शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) ह्यांनी आज (बुधवार, ४ सप्टेंबर) मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीबाधित शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. ह्यावेळी खासदार संजय राऊत,  चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी ‘”सरकारला शेतकऱ्यांचे काही पडलं नाही,’ असे म्हणत महायुती सरकारवर (Mahayuti Government) टीका केली होती. यावरून आता राजकारण रंगू लागले असून कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ‘आदित्य ठाकरे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात, तुम्हाला शेती माहित नाही,’ अश्या शब्दांत निशाणा साधला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे यावेळी म्हणाले, “सरकारला शेतकऱ्यांचे काही पडलं नाही म्हणूनच आम्ही रात्रीपासून इथं शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून पडलोय. आदित्य ठाकरे यांनी चार्टर विमानाने यावं आणि फोटो शूट करावं आणि पूतना मावशीचा प्रेम दाखवावं, यासारखं दुर्दैव काहीच नाही. आदित्य ठाकरे म्हणतात या राज्याला कोण कृषिमंत्री माहित नाही. आदित्य ठाकरे आणि मी दोघांनी बैल जोडी तीफनी वरती बसावं आणि कोणती पण मारते बघावं. तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात, तुम्हाला शेती माहित नाही, बांध माहित नाही, तीन वर्षानंतर आता बांधावर येत आहात. तेही निवडणूका समोर आहे म्हणून, अशा गलिच्छ राजकारणाला मला उत्तर द्यायचं नाही, ते राजकारण करण्यासाठी आता दौऱ्यावर आहेत. आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आलोय, कारण आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांना सर्वपरी मदत करण्याचा पण प्रयत्न करतोय. एनडीआरएफ, एचडीआरएफ आणि विमा कंपनी कडून मदत मिळणार आहे. सरकार आणि कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीमागे ताकदीने उभा आहे. अडचणीच्या काळात सरकार मदत करायला कमी पडणार नाही,” असे ते म्हणाले.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या लाडका शेतकरी विधानाबाबत प्रतिक्रिया देत ते पुढे म्हणाले, “अगदी बरोबर आहे त्यांचे म्हणणे, मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परळी येथे झालेल्या कृषी प्रदर्शनात सांगितले, शेतकरी लाडका कसा आहे. शेतकरी लाडका कसा आहे, पीएम सन्मान योजनेतून ६ हजार दिले जातात. किसान नमो योजनेतून शेतकऱ्यांना ६ हजार दिले जातात. शेतकऱ्याच्या खिशातून फक्त एक रुपया देऊन त्याच्या पिकाचे संरक्षण केला जाते. वीज माफी केली म्हणून शेतकरी आमच्यासाठी लाडका आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Sharad Pawar माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागलेत?: Hasan Mushrif

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss