मुंबई : आमचे आणि भाजपाचे मिळून 165 आहेत, पुढील निवडणुकीत 200 निवडून आणू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांनी भर विधानसभेत म्हटले आहे. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे बाळासाहेबांचे शब्द होते अशी आठवणही यावेळी त्यांनी करुन दिली.
Eknath Shinde mentions his children, breaks down during Assembly speech
Read @ANI Story | https://t.co/fMXVQKxcUO#EknathShinde #AssemblySpeech #MaharashtraPolitics pic.twitter.com/eWco9ktkqw
— ANI Digital (@ani_digital) July 4, 2022
सभागृहात केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. “भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, असे म्हणतात. पण, एवढ्या जणांना ईडीच्या नोटिसा पाठवल्या. पण कुणाला टाकले का जेलमध्ये? नाही ना? कारण त्यांना ही लढाई प्रेमाने जिंकायची होती,” असेही मुख्यमंत्री (Eknath Shide) म्हणाले. व देवेंद्र फडणवीसच सर्वांत मोठे कलाकार आहेत असेही ते म्हणाले.
हेही वाचा :
सभागृहातील भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक
शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, पण माघार नाही, असे शिंदेंनी म्हटलं आहे. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार कऱणाऱ्यांकडे गेलो आहे. त्यामुळे 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार,” असा विश्वास एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांनी व्यक्त केला.