spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive : पंडित राजकुमार शर्मानी केली भविष्यवाणी, आदित्य ठाकरे बनणार नवीन हिरो!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister of the state Eknath Shinde) हे बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले आणि एकटेच बाहेर न पडता तब्ब्ल ४० आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडले. आतापर्यंतच हे सर्वात मोठं बंड असल्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे अस्थिर झाली होती. त्यानंतर राज्यात आलेल्या शिंदे सरकारबाहेर अनेकांनी तर्क वितर्क लावले आहेत. याच संदर्भातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ‘टाईम महाराष्ट्र’ ने देशातील ज्येष्ठ भविष्यवेत्ते पंडित राजकुमार शर्मा यांची मुलाखत घेतली आहे. ज्येष्ठ पंडित राजकुमार शर्मा (Senior Pandit Rajkumar Sharma) यांनी या मुलाखतीत अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. तर येत्या काळात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हा नवीन हिरो बनून बाहेर येईल असं पंडित पंडित राजकुमार शर्मा यांनी म्हटलं.

सध्या आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात दिशा सालियन (Disha Salian) आत्महत्येमागे आदित्य ठाकरे यांचा हात आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आणि एस.आय.टी (SIT) सुद्धा चौकशीसाठी स्थापन करण्यात आली. यावर पंडित राजकुमार शर्मा म्हणाले आहेत कि, येत्या काळात जे आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आले होते ते सर्व खोटे ठरणार आहेत. अजून आदित्य ठाकरे लहान आहे पण येत्या काळात त्यांचं भाग्य खूप चांगलं आहे. तर २०३२ पर्यंत आदित्य ठाकरे मुख्यमंत्री सुद्धा बनू शकतात असं त्यांनी सांगितलं. हिंदुत्वचा भगवा झेंडा हाती घेऊन भविष्यात २०३६ मध्ये एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्ररित येतील असं त्यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे.

२०२३ मध्ये शिवसेनेनी कुणावर जास्त भर दिला पाहिजे असा प्रश्न ज्या वेळी पंडित राजकुमार शर्मा यांना विचारलं त्यावर त्यांचं उत्तर असं होतं. येत्या काळात शिवसेनेनी उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा जास्त भर हा आदित्य ठाकरे यांच्यावर दिला पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी जर त्यांच्या पिताश्री आणि जेष्ठ शिवसैनिक (Pitashree and senior Shiv Sainik) यांच्या मार्गदर्शनात काम केलं तर अत्यंत चांगलं होईल. २०२३ च्या २३ जानेवारी नंतर आदित्य ठाकरे यांच्या राशीमध्ये अजून चांगले योग येतील असं पंडित यांनी सांगितलं. २०२३ मध्ये आदित्य ठाकरे सर्वांना एकत्र आणून पुढे जाण्याचा विचार करतील. तर अडीच वर्षात आदित्य ठाकरे शिवसेनेला मजबूत करतील, असं भविष्य पंडित राजकुमार शर्मा यांनी टाईम महाराष्ट्र मध्ये केला आहे.

हे ही वाचा : 

Bigg Boss Marathi 4 बिग बॉस मराठीच चौथ पर्व जिंकणाऱ्या स्पर्धकाला बक्षीस म्हणून मिळणार ‘इतकी’ रक्कम!

Exclusive : २०२३ हे वर्ष मुख्यमंत्री शिंदेंना कसे जाणार?; पंडित राजकुमार शर्मा म्हणाले, १० – १५ लोक…

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss